सैनिकी जिवन..
"म्या आज संध्याकाळी डिवटीला निघणार हाव!
हे मझ्या माई ला कळाल....
तवा मझी माय मला येऊन म्हणाली..
..अरं "जनु "दोन दिसावर लक्ष्मीम्या आल्यात आणि गावात बी लई मोठा गणपती बसवलाय.."रोजच लई बघायचे काई काई हाय म्हणं.. आणि तु जाणार हाईस म्हणं
तु आज जावु नको गणपती उठल्यावर जाए..
तवा मी म्हणालो माय .. सैनिकाच जिनच असं असत बघ.."ना कोणता सण "ना कोणता वार.. जावावच लागताय.. बघ ..
पण माय आम्ही जवा येता तवाच आमचा सण आणि बार्डरवर आमच्या साहेबांन गणपती बसवीलाय म्हणं ... तु काय बी घोर करू नको बघ... पुढे माय म्हणाली अरं ते टिवीत एगळच... काहीतरी दाखवालेत कि "रामरहीम बाबाच.. अरं म्हण दिल्ली हुन जाणार्या सगळ्या रेलवाई बंद हायत म्हण ... मी म्हणालो माय मी रेलवाई जाणार नाही ...म्या ईवायनात जाणार हाय!
पुढे म्हणाली ..कुशाल चांगल र्हाय...
आणि म्हणाली अरं त्या आसामात तर पाणी पाऊस लई हाव म्हणं थोड जपूनच बघ.. वले कपडे घालू नको , पाण्यात लई भिजू नको .
म्या म्हणालो ठीक हाय... आणि म्हणाली " तुझ्या बागात शाळकडच्या रामराव काकाच्या ईतल दोन्ह किलू "तुपाच डब्ब हाय.. आणि दुसऱ्या ब्यागत "नुकतीचे उंढे आणि लाह्याचा चिवढा..हाय आणि भरणी भर आंब्याच खार बी हाय. . सगळे जण मिळून खा.......म्हणाली....
एक कविता आठवली ..
म्हणून म्हनतो आनंदानं भरावी तुझी वटी
पुन्हा एकदा जल्म घेवा माये तुझी पोटी
तुझ्या चरणी ठेवून माया धरावं तुजं पाय
तवा मले पायामंदी दिसती माझी माय
हंबरून वासराले …
जनार्धन पाटील भुत्ते
मो.9766738673
सिमा सुरक्षा बल
आसाम




