माय ह्या आसामी परदेशात मन काही रमणा
तुझ्या हाताच्या गोधड्या बिना झोप काय येईना ....
माय खरचं या धावपळीच्या जगात
हरवलेली गोधड परत मिळेना.
आसाम मध्ये कडक थंडी ,थंडीचे कपडे घालून देखील ती जाणवत होती ...काही तरी जाणीव करून देत होती .मोठं मोठाले डोंगर ..धुकं चांगलीच पसरली होती .घरापासून तब्बल 3 महिने लांब माझ्या माईची आठवण सारखीच येत असते ती पण आठवण काढत असेल ना.. म्या तिचा लाडका आज जवळ जवळ 6 वर्ष पासुन घरापासून लांब राह्याची सवय झालीय पण येतेच आठवण त्या धुक्यात त्या गारठ्यात आठवणीच्या रिमझिम थेंबांचा छिडकाव चालूच
होता ..
आज मन भरलं ह्या आसामच्या थंडीमुळे माय आणि गोधड खूप आठवतेय
पण काय ती माया हरवून बसलोय ,गोंजारणारा मायेचा हात गमावल्या वाणी झालंय.
काल रात्री थंडीमुळे सारखं कूस बदलत होतो झोपच येत नव्हती वाटत होत ..माय माझी आतुरतेने वाट बघतेय ...विचार येत होते आणि माझ्या माईचा चक्क फोन आला मी वेळ न घालविता एकाच रिंग मध्ये रेसिइव्ह केला ...माय बोलली अरं जन्या थंडी लई हाय का रं" मी म्हणालो नाही ...
माय आपल्या इथल्या सारखी नाही . माझ्या माईला समजले असावे ..पुढे म्हणाली कानाला कानपटी बांधून झोप , सुटर घालत जाय..गरम पाणी पित...जाय म्हणजे थंडी काय वाजणार नाही... ...... एवढे बोलून माझ्या माईन फोन ठेवली ..
तुला कस सांगणार माय येथ लय थंडी हाय..त्या थंडीत त्या धुंदीत त्या धुक्यात गारठ्यात तुझ्या हाताने शिवलेल्या गोधडीची आठवण आली ...
जनार्धन पाटील भुत्ते..
मो.9766738673
आसाम..

Nice dear आपल्या आठवणी अश्याच फुलवीत राहू दे !
ReplyDeletetnx
DeleteNice
ReplyDelete