म्युच्युअल फंड म्हणजे काय ?

(हि सर्व माहिती आहे आपल्या माणसान्न साठी पाठवत आहे मी कुठला पण एजेंट नाही,व कुठला अर्थ सलाहकार नाही,मला जेवडे माहिती आहे ते शेयर करत असतो .....)


म्युच्युअल फंड म्हणजे काय ?

११ मित्र होते, त्यांना भाड्याने घर घ्यायचे होते. त्यांनी मिळून एक माणूस नेमला. त्या माणसाचे नाव आपण MF पकडू. MF चे काम आहे की तो सर्वांसाठी घर शोधेल. घरमालकाशी, बोलणी करेल, भाडं पण तोच ठरवेल. ११ मित्रांकडून दरमहा भाडं जमा करेल. घरमालकांना ते घरभाड नेऊन देईल.
इथे MF थोड्या फी मध्ये, सर्व लोकांची सारखी असलेली समस्या सोडवत आहे. त्यामुळे त्या ११ मित्रांना आता घर शोधण्याची चिंता राहिली नाही. ते आपल्या कामावर लक्ष देऊ शकत होते.
MF = MUTUAL FUND
तसंच काहीसे म्युच्युअल फंड मध्ये आहे. म्युच्युअल फंड ही सर्वांची एक समस्या सोडवतो, ती म्हणजे “गुंतवणूक कुठे करावी ?” इथे जसे ११ मित्र मिळून एकत्र आले. तसेच म्युच्युअल फंड मधे होते. अनेक गुंतवणूकदार म्युच्युअल फंड कडे येतात.
काही गुंतवणूकदारांना पैसे काही दिवसांकरिता गुंतवायचे असतात, काहींना काही महिने, काहींना काही वर्ष आणि काहींना तर अनेक दशके. मग गुंतवणूकदारांना त्यांच्या गरजांनुसार म्युच्युअल फंडमध्ये योजना दिल्या जातात. लोक आपले पैसे म्युच्युअल फंडकडे देतात, मग म्युच्युअल फंड ठरवतात की पैसे कुठे गुंतवायचे. याबदल्यात ते काही फी घेतात.
सोप्या भाषेत, जे काम तुम्हाला करायला जमत नाही, ज्यात तुम्हाला अनुभव नाही, ज्या कामाचे तुम्ही तज्ञ नाही, ते काम दुसऱ्याला करायला देणे. उदाहरण डॉक्टर, ड्रायवर, आचारी आणि म्युच्युअल फंड. गुंतवणुकीचे तुम्ही तज्ञ नसल्यामुळे आणि तुम्हाला याचा अनुभव नसल्यामुळे, हे काम आपण अशा संस्थेला सोपवणे, जी हेच काम इतर लोकांसाठी पण करते. तर अशी संस्था आहे म्युच्युअल फंड.

म्युच्युअल फंड चे फायदे कोणते ?

तज्ञ

तज्ञ म्हणजे असा व्यक्ती ज्याला एखाद्या क्षेत्राचे ज्ञान आहे किंवा एखाद्या क्षेत्रात लागणारे कौशल्य त्यात आहे.
म्युच्युअल फंड मध्ये तज्ञ व्यक्तीची फंड मॅनेजर म्हणून निवड करण्यात येते. अशा व्यक्तींना सहसा १५-२० वर्ष गुंतवणूक क्षेत्रात काम करण्याचा अनुभव असतो. फंड मॅनेजर हे पूर्ण वेळ याच क्षेत्रात काम करतात. त्यामुळे त्यांना या क्षेत्राबद्दल चांगले ज्ञान असते.
सामान्य माणसाला आपला नोकरी-धंदा करून, कुठे ? किती ? गुंतवणूक करावी आणि कधी विकावी ? या सर्व गोष्टींचा अभ्यास करणे कठीण जाते. त्यामुळे तज्ञ व्यक्तीकडून आपले काम करून घेणे सहसा फायदेशीर ठरते.
तुम्ही कधी वजन कमी करण्याचा प्रयत्न केलाय का ? तुम्ही म्हणणार मला वजन कमी करायला डायटीशिअन ची गरज नाही, मला जिम मध्ये बॉडी बनवायला कोच ची गरज नाही. २-३ वर्ष जातात, तरी आपले वजन काही कमी होत नाही वा आपली बॉडी काही बनत नाही.
काही लोक नक्कीच तज्ञाविना हे काम करू शकतात. पण त्यांना हे काम तज्ञांएवढं चांगलं करायचं असेल, तर त्यांना स्वतःलाच तज्ञ बनाव लागतं. आपण सर्व गोष्टीचे तज्ञ बनू शकतो का ? आपल्याकडे तेवढा वेळ आहे का ?
म्युच्युअल फंड मधे एक तज्ञ – ज्याला या कामाचा अनेक वर्षांचा अनुभव आहे. तो तुमची गुंतवणूक सांभाळतो. ....

Diversification (वैविध्यपुर्णता)

म्युच्युअल फंडमध्ये, गुंतवणूक हि अनेक जागी केल्या जाते, म्हणून गुंतवणूक हि वैविध्यपूर्ण असते. त्यामुळे धोका कमी होतो. समजा तुमची पूर्ण गुंतवणूक एकाच प्लॉट मधे आहे, फक्त सोन्यातच आहे किंवा फक्त तुमच्या व्यवसायात आहे. अशा वेळेस, तुमच्या गुंतवणुकीवर काही संकट आले तर फार नुकसान होईल. याउलट जर तुमची गुंतवणूक वैविध्यपूर्ण असेल आणि एका गुंतवणुकीवर संकट आले, तर तुमचे जास्त नुकसान होणार नाही. झालेलं नुकसान दुसरी गुंतवणूक भरूनही काढू शकते.

Liquidity (तरलता)

म्हणजे किती सहजपणे तुम्ही गुंतवणूक विकू शकता. तरलतेबद्दल सविस्तर माहिती आपण गुंतवणुकीचे प्रकार या लेखात पाहिली आहे. समजा तुमची गुंतवणूक घर किंवा जमीन मध्ये आहे आणि तुमच्यावर काही संकट आल्यामुळे तुम्हाला थोड्या मोठ्या रक्कमेची गरज आहे. अशा वेळी पटकन घर विकून रक्कम मिळवणे हे सोपे काम नाही. पण म्युच्युअल फंड मध्ये हे काम फारच सोपे आहे. साधारणतः ४-५ दिवसात तुम्हाला तुमची रक्कम परत मिळते. काही म्युच्युअल फंड च्या योजना मध्ये तर तुमची रक्कम लगेच IMPS द्वारे तुमच्या खात्यात जमा होते.

परतावा

तज्ञ आपली गुंतवणूक सांभाळत असल्यामुळे परतावा चांगला मिळतो. तसेच म्युच्युअल फंडद्वारे तुम्हाला इतर व्यवसायात, बॉण्ड मध्ये गुंतवण्याची संधी मिळते, जिथे परतावा जास्त मिळू शकतो. म्युच्युअल फंड च्या काही योजनांमध्ये तर २० वर्षात १०० पट परतावा मिळाला आहे. म्हणजेच १ लाख गुंतवलेले २० वर्षात १ करोड झाले आहेत. परतावा बद्दल सविस्तर माहिती आपण पुढील येणाऱ्या काही लेखात पाहू.

व्यवसाय न करता व्यवसायाचे मालक व्हा.

म्युच्युअल फंड चा सर्वात मोठा फायदा हा की, व्यवसाय न करता व्यवसायाचे मालक व्हा. TATA, MARUTI, RELIANCE, GODREJ, HUL यासारख्या इतर कंपनीचे तुम्ही अप्रत्यक्षपणे मालक होऊ शकता. तुमचे पैसे म्युच्युअल फंड यांसारख्या कंपनीमध्ये गुंतवणूक करतात. त्यामुळे या कंपणींना होणारा फायदा हा तुमचा फायदा होतो. आपल्या देशातील कंपनी आता विदेशात माल विकू लागल्या आहेत. भारतातील औषधी अमेरिकेत विकल्या जातात. भारतातील कंपनी युरोप आफ्रिकेत गाड्या विकतात. भारतातील बासमती तांदूळ पूर्ण जगात जातो. आपल्या देशातील कंपनी ह्या प्रगती करत आहे. त्यांच्या प्रगतीमध्ये सहभागी होवून आपण आपली संपत्ती वाढवू शकतो.

भारतीय कंपनींचे भविष्य चांगले का असू शकते ?

भारत हा युवकांचा देश आहे. भारताची ६५% लोकसंख्या ३५ वर्षाखालील आहे. तरुण लोक म्हणजे देशाची काम करणारी जनता. एवढे लोक तरुण आहेत, म्हणजे देशात काम करणाऱ्यांची कमी नाही. हे लोक काम करतील, जास्त कमावतील आणि त्यांच्या गरजा पूर्ण करण्याकरिता कंपनी आणखी उत्पादन करतील. तरुण लोकसंख्या असल्यामुळे हि जनसंख्या फक्त बसून खाणारी नसेल तर काम करणारी असेल. भारत जवान होत असताना इतर देश म्हातारे होत असतील. २०२० मध्ये भारतीय जनसंख्येच वय २९ वर्ष असेल. त्याचवेळी चीन चे ३७ आणि जपान चे ४८ असेल. यावरून आपल्याला असे दिसून येते भविष्यात इतर देशांपेक्षा आपल्या देशात युवा जास्त असल्यामुळे आपल देश ताकतवर असेल आणि प्रगती करेल. या प्रगती मध्ये अनेक कंपनी फार मोठ्या होतील. फार पैसा बनवतील. या देशाच्या प्रगतीमध्ये आपण म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करून सहभागी होवू शकतो.

म्युच्युअल फंड सुरक्षित आहे का ?

SEBI हि सरकारी संस्था म्युच्युअल फंड च्या कामकाजावर लक्ष्य ठेवते. पण कोठे गुंतवणूक करावी ? हे म्युच्युअल फंड स्वतःच ठरवतात. SEBI जरी लक्ष्य ठेवत असेल, तरी किती परतावा मिळेल ? हे SEBI ठरवत नाही. SEBI चे काम म्युच्युअल फंड पारदर्शकरित्या काम होत आहे का नाही हे पाहणे आहे. त्यासाठी SEBI वेळोवेळी दिशानिर्देश देते. गुंतवणूकदारांच्या हिताच रक्षण करण्याच काम SEBI करते. TELECOM क्षेत्रात जसे TRAI, विमा क्षेत्रात IRDA, बँक क्षेत्रात जसे RBI तसेच काहीसे काम SEBI म्युच्युअल फंड क्षेत्रात करते. SEBI कडून परवानगी मिळाल्यावरच म्युच्युअल फंड आपला व्यवसाय सुरु करू शकतात. म्युच्युअल फंड च्या Trustee ची नेमणूक SEBI च्या परवानगीने होते...............
अजून माहिती पुढच्या ब्लॉग वर.....

हावडा ब्रिज

                                 हावडा ब्रिज 

जय हिंद मित्रहो ...........              कोलकाता म्हणल कि सर्वात अगोदर आपल्या डोळे पुढे हावडा ब्रिज उभा टाकतो ......माझी DUTY आसाम ह्या राज्या मध्ये असलेल्या  मुळे आम्हला आसाम जायचे म्हणल तर कोलकता वरूनच जाव लागत होत  ....मी ५० दिवस सुट्टी संपून अस्साम्म ला निघलो व माझ्या पुढच्या ट्रेन ला वेळ असलेल्या  मुळे मी कोलकता च्या ब्रिज वर तब्बल 2 तास घालवले....

अतिशय सुंदर असा पुल बघत रहाव अस वाटत ........

कोलकता व शेजारील हावडा शहराला जोडणारा हा पूल ....
१९४२ साली बांधकाम पूर्ण झाल ....ह्या पुलाला नदीपात्रा मध्ये  एकहि खांब वापरला गेला नाही.... 

पुलाच्या बांधणीसाठी त्याकाळी जमशेटजी टाटांच्या ‘टाटा स्टीलने’ लोखंडाचा पुरवठा केला होता.
जवळपास २६.५ हजार टन लोखंड वापरून उभारलेल्या या पुलाची लांबी १५२८ फूट तर रुंदी ६२ फूट आहे. नदी पात्रात जवळपास २८२ फूट उंचीवर विराजमान हा पूल त्याकाळातील जगातला तिसऱ्या क्रमांकाचा पूल होता
           १९४२ साली बांधून पूर्ण झालेल्या या पुलाची खासियत अशी की या पुलाच्या बांधणीत एकही नट-बोल्ट वापरला गेलेला नाही. तसेच या पुलाला नदीपात्रात एकही खांब नाही. नदीच्या दोन्ही तटांवर ‘कँटीलिव्हर’ पद्धतीने या पुलाची उभारणी केली गेलेली आहे..........









संपूर्ण लोखंडी खिळेन बनलेला हा पूल आज हि इतका मजबूत आहे कि ..दररोज जवळपास सव्वा लाख वाहने ..आणि पाच लाख पादचारी या पुलाचा नियमित वापर करतात.......






एक प्रेक्षणीय ठिकाण या नात्याने दरवर्षी लाखो पर्यटक देश-विदेशातून या पुलाला भेट देतात. देशातलं सर्वात जुनं म्हणून नावारूपाला आलेलं ‘हावडा जंक्शन’ जोडणारा पूल म्हणूनही या पुलाचे प्रचंड महत्व आहे.
पुलाच्या कलकत्त्याच्या बाजूला असणारे ‘मालिक घाट’ हे फूल मार्केट आजही तिथे चालणाऱ्या फुलांच्या व्यापाराकरता प्रसिद्ध आहे. वाहतुकीचा प्रचंड बोजा सहन करत हा पूल आजही दिमाखात उभा आहे.
 











ऐतिहासिक स्मारकाचे महत्व असलेल्या या पुलाला, पुलाच्या खांबांना दरवर्षी, लाखो लोक पान खाऊन आणि तंबाखूच्या पिंक टाकून रंगवतात…

तरीही ऊन, वारा, पाऊस, वादळे यांची पर्वा न करता, मुकाटपणे वाहने आणि लोकांना ऐलतीरावरून पैलतीरावर नेण्याचे काम



जय हिंद जय महाराष्ट्र ..........कसा वाटला नक्कीच सांगा 


आमची गुण्या माय.....


आमची गुण्या माय...

रामपार्यात चहाच्या घोट घेऊन ' ईनामात( शेतात) जाऊन .. खंळ खळ .. रान निंदून काढणारी आमची गुण्या माय मला म्हणली .. " कधी जायचं ..आसामाला.. duty ला जनु .. " मी म्हणालो हाव अजून .. आखाडीच्या जत्र पर्यंत ..आणि पुढे म्हणालो .. बरं हाय का आमंदाच साल.. तवा गुण्या माय म्हणली आमंदाच साल तर लई चांगल हाय बापू ... मोड तर सोन्या सारखा हाय .. अजुन तर खात सुद्धा घातला नाही ... खात घातल्यावर तर अजुन खुलल... आणं पुढे म्हणाली ... यंदा .. गावरान दोडक्याच.. भेंडराच .. चवळीच .. आणं शेंडणीच बीच .. घालायच.. ईसरून गेल .. घातले असल तर ... दोन्ह तीन महिन्याच्या भाजीचा कुटाना .... मिठला असता .. आण दरवर्षी सजगुरे बि एक वळभर राहायचे . लेकरायला " खारोड्या , पापड्या आणि मलिदा साठी यंदा समंदे इसरल .. बापू .. ह्या ऊसाच्या आण कापसाच्या नादात ... म्हणून आलाव रामंपार्यात .. आता तरी खळं खळं रान निंदून निट कराव ..म्हणून ..
जनार्धन पाटील भुत्ते ..
मो.9766738673..

शेयर मार्केट भाग -3







बेसिक माहिती..... 

FACE VALUE / PAR VALUE

Face value is defined as "the nominal value or dollar value of a security stated by the issuer." It is determined by the nominal value of the security, stock or bond upon issuance. Generally, face value is determined using the company's balance sheets and the projected real costs for growth within the company. बाजारातील share ची किम्मत म्हणजे Actual Value असते आणि Face Value ही कंपनीचे बाजारमूल्य, भांडवल आणि balance sheets यावरून Face Value नुसार निश्चित होत असते. साधारणपणे 1, 2, 5 आणि 10 अशी ती face value असते.
VOLUME OF SHARE

Total Number or amount Of shares traded in a particular period. The number of shares or contracts traded in a security or an entire market during a given period of time. एखाद्या share मधील एकंदरीत खरेदी-विक्री करणार्यां ची संख्या असं आपण ढोबळमानाने म्हणू शकतो. जर ABC share मध्ये 500 buyers आहेत आणि 200 sellers आहेत तर, 500 + 200 = 700 ही त्या share ची आत्ताची volume म्हणता येईल. ती केंव्हाही कमी-जास्त होऊ शकते कारण कोणताही गुंतवणूकदार कधीही खरेदी-विक्री करू शकतो. उदाहरणार्थ, ABC कंपनीबद्दल जर काही सकारात्मक बातमी आली तर त्यात अचानक Buyers वाढू शकतात आणि पर्यायाने volume ही वाढते. जर Volume जास्त असेल तर त्या share मध्ये volatility ही जास्त असू शकते. जर एखाद्या कंपनीचे त्रैमासिक निकाल असतील किंवा अन्य कारण असेल तर त्या कंपनीच्या share मध्ये volume जास्त असते. कारण त्या कंपनीच्या एकंदरीत निकालाला, बातमीला अनुसरून गुंतवणूकदार त्याचं मूल्यांकन करून त्याला खरेदी किंवा विक्री करू शकतात. उदाहरण द्यायचं झालं तर RBI Policy!! कारण RBI Policy च्या दिवशी Banking shares मध्ये चांगलं volume असतं. साधारणपणे, Volume ही Intraday traders साठी अत्यंत महत्वाची असते. कारण खरेदी-विक्री जास्त असेल तर त्यात volatility जास्त येऊन त्या share ची किम्मत खाली-वर होऊन त्यात नफ्याची संधि जास्त असते. जर stock च volume कमी असेल तर त्यात फार उतार-चढाव नसतो आणि नफ्याची संधी कमी असते. म्हणजे खरेदी करणारे 100 आहेत आणि विक्री करणारे 150 तर त्या stock च्या किमतीत फार वाढ किंवा तूट होणार नाही. पण तेच जर 5000 buyers आहेत अन 2000 sellers आहेत तर हे उघड आहे की त्याच्या किमतीत फार फरक पडू शकतो. मी जर एखाद्या कंपनीचा एकच share 5 रुपयांना खरेदी करून 10 रुपयाला विकला तर माझा नफा फक्त 5 रुपये असेल. पण त्याचजागी, जर मी 100 shares 5 रुपयाला घेऊन 10 रुपयाला विकले तर माझा नफा 500 रुपये असेल. Volume चही असच असतं. जर समझा ABC stock मध्ये 1000 buyers आहेत आणि sellers नाहीतच. म्हणजे 1000 ही त्याची volume. तर ज्याने खरेदी केले आहेत त्याला sell करताना अडचण येऊ शकते. कारण जर अजून गुंतवणूकदार त्यात खरेदी-विक्री करत नसतील तर त्या stock च्या किमतीत बदल होणारच नाही, आणि खरेदी करणार्यायला अपेक्षित नफा न मिळाल्याने तो विकणारही नाही. त्यामुळे share चं High Volume असणं हे एकंदरीत गुंतवणूकदाराच्या फायद्याचं ठरतं, कारण High Volume gives liquidity. आता liquidity काय हे नंतर बघूच.
VOLATILITY

Volatility म्हणजे अस्थिरता. Share बाजारातील याचा अर्थ असा की, एखाद्या share चा किंवा निर्देशांकाचा भाव स्थिर नसणे. तो कमी वेळात वेगाने चढता किंवा उतरती किमतीला जाणे म्हणजे volatility. Volatility कमी असणे म्हणजे त्या stock किंवा Index (NIFTY वगैरे) मध्ये जास्त fluctuation नसणे. कमी Volatility म्हणजे Intraday traders ला नफा कमवण्याची संधी जास्त नसते. Volatility जास्त आहे म्हणजे त्या stock/Index ला खरेदी किंवा विक्री करणार्यांyची संख्या मोठी असल्याने त्याच्या किमतीत मोठ्या प्रमाणात आणि वेगाने बदल होत असतो. अशाने Intraday Traders ला नफा कमवण्याच्या अधिक संधी असतात. मोठी राजकीय घडामोड, केंद्रीय अर्थसंकल्प, RBI Policy, राष्ट्रीय आपत्ती, आंतरराष्ट्रीय घडामोड यामुळे बाजार हे Volatile असतात. आणि particular share च्या बाबतीत सांगायचं झालं तर, कंपनीच्या Quarterly Results, काही घोषणा किंवा बातमीमुळे त्या कंपनीचे share volatile असतात. नुकतच झालेली घडामोड म्हणजे, Infosys कंपनीचे CEO विशाल सिक्का यांनी पदाचा राजीनामा दिल्याच्या नंतर Infosys चा volatile झाला होता अन कोसळला होता. Volatility measure करण्याचे काही विशिष्ट parameters असतात आणि त्यावरून underlying asset (share किंवा Index) ची expected value काढता येते. Volatile market साठी volume कारणीभूत असतं आणि अति volatility upper किंवा lower circuit ला कारणीभूत ठरतं.
INTRADAY TRADING

या प्रकारात तुम्ही एखाद्या कंपनीचा share आजच खरेदी करता अन आजच विकता. भारतीय Share बाजार सकाळी 9.15 ला सुरू होतो अन दुपारी 3.30 ला बंद होतो. ह्या एकदिवसीय कालावधीत जर share खरेदी केला अन विकूनही टाकला तर त्याला Intraday Trading म्हणतात. असं करण्याचे काही फायदेही आहेत अन तोटेही. पण Intraday Trading करण्यामागे कमी कालावधीत जास्त पैसे मिळवणे हा हेतु असतो. उदाहरणार्थ, एखाद्या कंपनीबद्दल काही सकारात्मक बातमी असेल किंवा त्या कंपनीचे आज चांगले त्रैमासिक निकाल (Quarterly Results) अपेक्षित असतील तर सकाळी तो share जास्त quantity ने खरेदी करायचा अन चांगला परतावा मिळताच त्याच दिवसात विकून टाकायचा. फायदे- कमी कालावधीतं चांगल्या परतव्याची शक्यता असते. Intraday trading करण्यासाठी ब्रोकर किंवा कंपनी तुम्हाला margin (साध्या भाषेत उधारी) देते ज्यात तुम्ही 100 रुपये असतांनाही 1000 रुपयांपर्यंत खरेदी-विक्री करू शकता. पण अट अशी असते की तो trade तुम्हाला त्याच दिवशी संपवावा लागतो. Intraday Trading साठी brokerage कमी आकारलं जातं. साधारणपणे traded value 0.1% असतं जे खरेदी अन विक्री करताना द्यावं लागतं. तोटे- यामध्ये रिस्क अधिक आहे. दिवसातला पूर्णवेळ (trade पूर्ण होईपर्यंत) तुम्हाला यावर खर्च करावा लागेल. कारण त्या share ची किम्मत कमी-जास्त होत असते अन योग्य दर येताच तुम्हाला तो विकावा लागतो.
DIVIDEND

साध्या सरळ भाषेत सांगायचं झालं तर कंपनीकडून त्यांच्या भागधारकांना अर्थात shareholders ना (ज्यांच्याकडे त्या कंपनीचे shares आहेत ते) काही रक्कम दिली जाते त्याला dividendम्हणतात. ही रक्कम फार जास्त नसते आणि प्रत्येक shareच्या मागे दिली जाते.बँकेत ठेवलेल्या रकमेवर ज्याप्रकारे व्याज मिळतं त्याप्रमाणे! तुम्ही जर एखाद्या कंपनीचे shareholder असाल अन ती कंपनी जर नफा कमावत असेल तर तुमच्या shareholding नुसार त्या नफ्यातीलकाही रक्कम कंपनी देते. Dividend ची मिळणारी रक्कम ही tax free असते आणि त्यावर कसलाही brokerage लागत नाही. ही रक्कम तुमच्या Demat खात्याला link असलेल्या savings खात्यात जमा होते. Dividend हा सामान्यतः QuarterlyResults (त्रैमासिक निकाल) दरम्यान जाहिर करतात. यात Interim dividend [अंतरिम लाभांश]आणि Final dividend [अंतिम लाभांश]असे दोन प्रकार आहेत. INTERIM DIVIDEND हा Quarterly Results किंवा Semi-Annual Results च्या दरम्यान दिला जातो. [[[एका आर्थिक वर्षात कंपनीला तीन महिन्याला एकदा याप्रकारे वर्षातून चार वेळा कंपनीचे निकाल जाहीर करावे लागतात. त्यापैकी March महिन्यातील निकाल हा Final अर्थात Annual Result अर्थात वार्षिक निकाल असतो तर September चे निकाल हे Semi-Annual असतात.]]] Interim Dividend हे कंपनीचा वार्षिक नफा,उत्पन्न इत्यादी निर्धारित होण्याची आधी दिला जातो.Interim Dividend हा Board Of Directors जाहीर करतात अन shareholder च्या approval मंजूरीद्वारे होतो. FINAL DIVIDEND हे कंपांनीच्या वार्षिक निकालाच्या (Final Results in March) वेळेस दिला जातो. कंपनीचा वार्षिक नफा, उत्पन्न, खर्च इत्यादी बाबी स्पष्ट झालेल्या असतात त्यानुसार हा Dividend दिला जातो.Final Dividend हा कंपांनीच्या AGM (Annual General Meeting) मध्ये मंजूर केला जातो. कंपनीचे Quarterly Results जेंव्हा जाहीर होतात तेंव्हा dividend ची घोषणा होते आणि तो केंव्हा मिळेल याचीही तारीख दिली जाते. त्यात Record Date आणि Effective Date या महत्वाच्या असतात.या Record Date आणि Effective Date नुसारच dividend चे लाभार्थी (अर्थात जे dividend मिळण्यास पात्र आहेत असे shareholders)ठरतात. Infosys, TCS, SBI, Coal India, Tata Steel, Maruti Suzukiसारख्या कंपन्या चांगला dividend देतात. त्यामुळे अशा shares मध्ये long term ची गुंतवणूक ही फायदेशीर ठरते. समजा, XYZ कंपनीने 10 रुपये dividend दिला आहे आणि 20 Nov ही त्याची Record Date आहे, तर 20 Nov ला त्या share चा भाव 10 रुपये कमी ने सुरू होतो. नंतर buyers आणि sellers आल्याच्या नंतर नेहमीच्या व्यवहाराप्रमाणे त्याची किम्मत कमी जास्त होत असते.
DIVIDEND YIELD

हा एक Financial Ratio आहे जो असं निर्देशित करतो की प्रत्येक कंपनी त्याच्या शेअर मूल्यानुसार प्रत्येक वर्षी किती dividend देते. Dividend yield calculate करण्यासाठी कंपनीने दिलेला वार्षिक dividend ला त्या कंपनीच्या share price ने divide करावे लागेल. समजा, XYZ कंपनीचा share price आहे 50 आणि वार्षिक dividend आहे 1 रुपये. सूत्रानुसार, 1/50=0.02 इतका dividend yield येईल आणि टक्केवारीच्या दृष्टीने तो 2% इतका असेल. Dividend yield जास्त असणे हे गुंतवणूकदारच्या दृष्टीने चांगलं असतं. मुळात Dividend हा कंपांनीच्या नफ्यातून दिला जातो, नफा जास्त म्हणजे dividend जास्त. ABC ही कंपनीचा share price आहे 100 आणि dividend pay केला आहे 1 रुपये. तसेच PQR ह्या कंपनीचा share price आहे 200 आणि dividend pay केला आहे 1 रुपये. यात ABC चा dividend yield आहे 1/100=0.01 म्हणजेच 1% आणि PQR चा dividend yield आहे 1/200=0.005 म्हणजेच 0.5% त्यामुळे ABC ही कंपनी चांगला नफा कमावत आहे अन त्याचा लाभांश गुंतवणूकदारांना देत आहे असा होतो.
BONUS

साधारण भाषेत किंवा रोजच्या जीवनात बोनस म्हणजे नेहमीच्या पगारापेक्षा कंपनी अधिकचं काहीतरी देते त्याला बोनस म्हणतो. म्हणजे दिवाळीत बोनस दिला वगैरे... Share बाजारातही Bonus संकल्पना अशाच पद्धतीने वापरला जातो. तुमच्याकडे असलेल्या shares च्या आधारावर कंपनी अधिकाचे shares देऊ करते तेंव्हा त्याला Bonus Shares म्हणतात. म्हणजे XYZ कंपनी आपल्या सर्व भागधारकांना / shareholders ना एकावर एक share फ्री देत असेल तर त्याला 1:1 (One As To One) Bonus म्हणतात. हे प्रमाण वेगवेगळ असू शकतं, म्हणजे 1:2 किंवा 1:5 किंवा 1:10 असं असेल तर प्रत्येकी दोन share ला एक share मोफत, भागधारकाच्या प्रत्येकी पाच share मागे एक share मोफत, प्रत्येकी दहा share ला एक share मोफत असं ते प्रमाण असू शकतं. पण जेंव्हा कंपनी Bonus देते तेंव्हा त्या share ची किम्मत बाजारात त्या प्रमाणात कमी होत असते. उदाहरणार्थ, जर XYZ कंपनीने 1:1 म्हणजे एकास एक प्रमाणात Bonus दिला असेल अन Bonus पूर्वी त्या share ची किम्मत 120 असेल तर bonus नंतर त्याची किम्मत 60 रुपये होते. हेच प्रमाण जर 1:2 असं असेल तर 120 ची किम्मत [120 * 2 / 3 या सूत्रांनुसार] ती किम्मत bonus नंतर 80 रुपये होते. याचा अर्थ असा की गुंतवणूकदाराचे मूल्य तेवढच राहतं; shares ची किम्मत कमी होते अन संख्या वाढते. Increased Quantity reduced price. हेतु – यामुळे कंपनीचे बाजारातील shares वाढतात आणि retail investor कडे त्याची संख्या वाढते. कंपनीच्या share ची किम्मत जर जास्त असेल आणि सामान्य गुंतवणूकदाराला जर ती किम्मत गुंतवणूक करण्यास मोठी वाटत असेल तर अशा परिस्थितीत त्याची किम्मत कमी करण्यासाठी Bonus चा मार्ग असतो, जेणेकरून त्या share ची किम्मत कमी होईल अन सामान्य गुंतवणूकदारास ती गुंतवणूक करण्यास आकर्षक वाटेल. शिवाय, बाजारातील shares वाढल्याने dividend ही कमी द्यावा लागतो. Infosys कंपनीने 2014 आणि 2015 साली 1:1 असा बोनस दिला होता. यामुळे share price 2014 साली 4000 वरुन 2000 आणि मग 2015 साली 1000 असं झालं. Bonus दिल्याने कंपांनीच्या बाजारातील shares ची संख्या वाढते अन किम्मत कमी होते, यामुळे त्या कंपांनीच्या भांडवल,Face Value किंवा बाजारातील क्षमता यात फरक पडत नाही. ज्याप्रमाणे Dividend साठी Record Date आणि Effective Date असतात त्याप्रमाणे त्या Bonus साठीही असतात. http://www.yourarticlelibrary.com/accounting/bonus-shares-accounting/bonus-shares-meaning-effects-and-advantages/70726
SPLIT

Stock Split चा निर्णय हा Board Of Director हे कंपांनीच्या AGM मध्ये घेतात. याचा हेतुही Bonus सारखाच आहे. कंपनीचे बाजारातील shares ची संख्या वाढावी आणि किम्मत कमी करून नवीन गुंतवणूकदारांना आकर्षित करता यावं हा त्यामागचा मूळ हेतु. यामध्येही सध्याच्या भागधारकांना अतिरिक्त shares दिले जातात पण त्या share ची बाजारातील किम्मत कमी केली जाते. यात मुख्य फरक असा की stock split झाल्यानंतर त्याच्या Face Value मध्ये बदल होतो. म्हणजे एखाद्या share ची Face Value 10 रुपये असेल तर त्याची Face Value 10 वरुन 5 केली तर एका share चे दोन share होतात; जर ती 2 रुपये केली तर एका share चे पाच shares होतात आणि Face Value दहाची एककेली तर एकाचे दहा shares होतात. जेंव्हा कंपनीकडे cash reserves जास्त असतात आणि dividend ratio हाताळणे अवघड होते तेंव्हा कंपनी Bonus देते आणि Share Split नंतर EPS [Earning Per Share]सुद्धा त्याच प्रमाणात कमी होतो.
RIGHT ISSUE

A rights offering (issue) is an issue of rights to a company's existing shareholders that entitles them to buy additional shares directly from the company in proportion to their existing holdings, within a fixed time period. म्हणजे, जर तुमच्याकडे एखाद्या कंपनीचे shares आहेत तर त्या आधारावर कंपनी तुम्हाला एका ठराविक कालावधीत, ठराविक किमतीने अजून काही shares देऊ करते. हे shares थेट कंपनीकडून offer केले जातात अन तुम्ही त्या कंपनीचे shareholder असल्याने तुम्हाला अजून kahi shares मिळू शकतात. तुम्हाला किती shares मिळणार हे तुमच्याकडे त्या कंपनीचे किती shares आहेत या प्रमाणावर अवलंबून असतं. उदाहरणार्थ, जर कंपनीने Right Issue च प्रमाण 1:5 (पाचास एक) असं ठरवलं असेल तर तुमच्याकडील प्रत्येकी पाच shares साठी एक share कंपनी देऊ करते. म्हणजे, तुमच्याकडे जर ABC कंपनीचे 200 shares आहेत आणि कंपनीने 1:5 हे प्रमाण ठरवलं आहे तर तुम्हाला ती कंपनी 40 shares ठराविक (जी सामान्यतः त्या share च्या बाजारातील किमतीपेक्षा कमी असते) देऊ करते, जे घ्यायचे का नाही याचा अधिकार shareholder ला असतो. कंपनीचा हेतु – कंपनी Right Issue देताना सामान्यतः discount rate ने देत असल्याने shareholders ते खरेदी करण्यास उत्सुक असू शकतात जेणेकरून कंपनीचे बाजारातील shares तर वाढणारच आहेत शिवाय कंपनीला या प्रक्रियेतून नवीन भांडवल मिळण्याची शक्यताही असते.
BUYBACK

ही प्रक्रिया Right Issue च्या थोडीशी उलटी आहे. जेंव्हा कंपनी बाजारातून अर्थात, सामान्य shareholder कडून कंपनीचे shares परत विकत घेते याला BuyBack म्हणतात. एखाद्या कंपनीने जर ठराविक rate ला shares buyback ची तर forms submit करून सामान्य shareholder आपल्याकडील shares कंपनीला परत करू शकतो. Buyback चे दर हे सामान्यतः बाजार दरांपेक्षा जास्त असतात जेणेकरून सामान्य गुंतवणूकदार अधिक नफ्याच्या आशेने shares कंपनीला परत करेल. Right Issue हा shareholder कडील उपलब्ध असलेल्या shares च्या प्रमाणात असतो; पण Buyback हा थोडासा वेगळा भाग आहे. यात तुम्ही किती shares देऊ शकता ते कंपनी ताब्यात घेते; असे apply करणार्याि अनेकांचे shares कंपनी आधी ताब्यात घेते अन नंतर किती कोणाचे किती shares परत घेणार हे ठरवलं जातं. लॉटरी पद्धतींने!
IPO (INITIAL PUBLIC OFFER)

जेंव्हा एखादी अस्तीत्वात असलेली कंपनी share बाजारात नव्याने उतरत असते, ज्या प्रक्रियेतून त्या कंपनीला भांडवल निर्मिती करता येते, तेंव्हा SEBI च्या परवानगीने Stock Exchange मध्ये list होत असते. IPO मुळे सामान्य गुंतवणूकदार थेट कंपनीकडून Shares विकत घेतल्याने कंपनीला नवीन भांडवल मिळतं. सामान्य गुंतवणूकदारांना त्यात सहभाग घेता यावा अन त्या कंपनीचे shares घेऊन कंपनीत भागधारक होता यावे यासाठी ती प्रक्रिया असते. या प्रक्रियेला IPO - Initial Public Offering प्रक्रिया म्हणतात. यात कंपनीला स्वतःची सर्व माहिती जाहीर करावी लागते. या प्रक्रियेत Share चा दर ठरवलेला असतो, Lot Size (अर्थात एका गुंतवणूकदाराला किमान किती shares घ्यावे लागतात – 20, 30, 50 असे lot size असतात) असते. एका IPO ची किम्मत ही साधारणपणे 15000 च्या आसपास असते. सामान्य गुंतवणूकदाराला कितीही Lot साठी apply करता येतं, पण शक्यतो एकच Lot Allocate केला जातो. IPO तून shares घ्यायचे असतील तर ते तुम्हाला ब्रोकरच्या माध्यमातून Apply करता येतं किंवा तुमच्या Demat ला लिंक असलेल्या savings बँक खात्याच्या OnlineBanking वापरुन तुम्हाला Apply करता येतं. पण त्या खात्याला ASBA ही सुविधा उपलब्ध असायला हवी. सर्वात महत्वाचं म्हणजे, तुम्ही IPO ला apply केलं आहे म्हणजे तुम्हाला ते shares मिळतीलच असे नसतं. ही प्रक्रिया लॉटरी पद्धतीने पार पाडली जाते. समजा, PQR कंपनी आहे. ती कंपनी भांडवल उभं करण्यासाठी बाजारात shares घेऊन येते. समजा कंपनी 500 कोटींचे भांडवल उभं करण्यासाठी 1 लाख shares बाजारात आणत आहे. कंपनी दर्जेदार असेल तर अनेक गुंतवणूकदार कंपनीत गुंतवणूक करू बघतात. समजा 2 लाख गुंतवणूकदारांनी त्या IPO प्रक्रियेत सहभाग घेतला असेल. Shares 1 लाख आणि त्यासाठी 2 लाख लोक apply करत आहेत म्हणजे सर्वांना ते shares मिळणार नाहीत. मग लॉटरी पद्धतीने गुंतवणूकदारांना shares allocate केले जातात. इथे मागणी जास्त आहे आणि shares कमी, म्हणजे IPO तून दिल्या जाणारे shares ची किम्मत वाढू शकते. ह्या सर्व प्रक्रियेसाठि तारखा निश्चित केलेल्या असतात. कोणते IPO चांगले, कोणत्या IPO साठी apply करावं हा निर्णय विचार करून घ्यावा लागतो. यासंबंधित माहिती टीव्ही चॅनल वर किंवा विविध वेबसाइटवर मिळेल. IPO या विषयावर बराच खल करता येईल. त्यासाठी वेगळं लिखाण करुयात... http://latenightedition.in/wp/?p=2685
RECORD DATE & EFFECTIVE DATE

Record Date ही “cut off” date असते ज्याद्वारे dividend, bonus इत्यादीसाठी shareholders (लाभार्थी) पात्र आहेत की नाहीत हे ठरवलं जातं. Record Date ही कंपनीकडून ठरवली जाते. वर सांगितल्याप्रमाणे Dividend, Bonus वगैरे जाहीर करताना कंपनी (Board Of Directors) Record Date आणि Effective Date (Ex Date) जाहीर करत असते. हा shareholders चा कंपनीकडील record असतो ज्यात Corporate Action साठी पात्र सर्व shareholders ची लिस्ट असते. जर Record Date च्या दिवशी तुम्ही shares खरेदी करत असाल तर तुम्ही Dividend, Bonus साठी पात्र नसता. कंपनीच्या Corporate Action दरम्यान या Dates अत्यंत महत्वाच्या असतात. सामान्य shareholders ला या Dates लक्षात घेऊनच त्या कंपांनीच्या shares ची खरेदी विक्री केली जाते. EFFECTIVE DATE ही record date च्या एक-दोन दिवस (Working Days) आधी असते. जर Effective Date च्या दिवशीपर्यंत तुम्ही त्या कंपनीचा share hold करत असाल तर तुम्ही त्या Corporate Action साठी (Dividend, Bonus वगैरे) पात्र असता. तुम्ही Effective Date च्या दिवशी जरी share विकत (sell) असाल तरी तुम्ही Corporate Action साठी पात्र असता, लाभार्थी, पण याउलट.... जर तुम्ही Effective Date च्या दिवशीच त्या share ला खरेदी करत असाल तर Corporate Action साठी तुम्ही पात्र असणार नाहीत. त्यामुळे तुम्हाला जर Corporate Action साठी पात्र ठरायचं असेल तर Effective Date च्या आधी तुम्ही ते खरेदी करू शकता आणि Effective Date च्या दिवशी किंवा नंतर केंव्हाही विकू शकता. PAYMENT DATE ला actually Dividend, Bonus इत्यादी shareholders ला मिळतात. एक उदाहरण – जर ABC या कंपनीने 5 रुपये dividend जाहीर केला असेल आणि त्यासाठी 25 ही Effective Date आणि 27 ही Record Date जाहीर केली असेल... आणि त्या कंपनीच्या share ची बाजारातील किम्मत 200 रुपये असेल... 1. जर तुमच्याकडे आधीपासूनच त्या कंपनीचे shares असतील आणि तुम्ही ते 24 तारखेला विकून टाकले तर तुम्ही Dividend साठी अपात्र असाल. 2. जर तुम्ही 25 तारखेला किंवा नंतर कधीही (जी Ex Date आहे) तुम्ही ते विकले तर तुम्ही पात्र असाल. 3. जर तुमच्याकडे त्या कंपनीचे shares नसतील आणि तुम्ही 24 तारखेला खरेदी करून 25 तारखेला किंवा नंतर विकले तरी तुम्ही पात्र असता. 4. पण जर तुम्ही 25 तारखेला खरेदी केले किंवा Record Date 27 तारखेला खरेदी केले तर तुम्ही Dividend साठी पात्र नसता. 5. यात अजून एक भाग असा आहे की, Effective Date च्या दिवशी त्या कंपनीच्या share ची किम्मत Dividend Amount ने कमी होते. या उदाहरणात, 25 तारखेला ABC चा share 5 रुपये कमी होऊन 195 रुपये होतो पण नियमित खरेदी-विक्री नियमांनुसार तो वधारू किंवा कमी होत राहतो. जे Long Term गुंतवणूकदार असतात त्यांना या Dates ने फार फरक पडत नाही. त्यांनी तो share hold केल्यामुळे Dividend, Bonus इत्यादी लाभ त्या गुंतवणूकदाराला मिळत राहतो. जे Arbitrage Opportunity शोधत असतात त्यांना या Dates महत्वाच्या असतात.
DEMATERIALIZATION

आधीच्या काळी shares खरेदी-विक्री प्रक्रिया Electronic पद्धतीने होत नसत. त्या काळी Physical Certificate असायचे ज्याद्वारे व्यवहार केले जात असत. ते Cerificate गुंतवणूकदाराला सांभाळून ठेवावे लागत आणि विक्री करताना submit करावे लागत. पण Electronic पद्धतीने ही प्रक्रिया जवळजवळ बंद झाली आहे. असं असलं तरी, काही लोकांकडे जुन्या काळी घेऊन ठेवलेले Shares Physical Format मध्ये असू शकतात. ते जर Electronic Format अर्थात Demat मध्ये ठेवण्यासाठी काही मूलभूत प्रक्रिया करावी लागते. याला आपण Dematerialization म्हणतो. एकंदरीत Physical Format मध्ये असलेले shares Electronic माध्यमात convert करणे. यासाठी Demat Account असणे अतिशय आवश्यक आहे. उदाहरणार्थ, जर एखाद्या गुंतवणूकदारणे 1999 काळी SBI चे shares घेऊन ठेवले आहेत. त्याकाळी Physical Certificate द्वारे व्यवहार केला जात असे. समजा त्या गुंतवणूकदाराने मध्यंतरीच्या काळात त्या shares ला काहीच केलेलं नाही. आज जर ते shares विकायचे असतील तर सर्वात आधी ते Physical Certificate त्यांच्याकडे असणे आवश्यक आहे. त्यानंतर एक Demat Account असणे आवश्यक आहे. त्यात Physical Certificate आणि Demat एकाच्याच नावे असणे आवश्यक आहे. मग एका प्रक्रियेनुसार ते shares Demat वर जमा करता येतात त्यानंतर मग Demat खात्यावरून त्याचा व्यवहार करता येईल.
काही ठोकताळे आणि संकेत

मार्केट कोणत्या दिशेने जाईल हे खात्रीने कोणीही सांगू शकत नाही; फार तर अंदाज वर्तवता येतात. पण अशा काही घडामोडी, घटना आणि क्षण असतात जेंव्हा बाजारातील volatility वाढून मार्केटच्या दिशेचा अंदाज घेता येतो. महिन्याच्या सुरूवातीला वाहन क्षेत्रात, कोणत्या कंपांनीच्या गाड्यांचा किती खप झालाय याची आकडेवारी येत असते. बर्याोचदा traders यानुसार trading करत असतात. कारण त्यादिवशी वाहन कंपन्यांच्या shares मध्ये volatility जास्त असते. RBI तीन महिन्याला पतधोरण पॉलिसी जाहीर करत असते. त्या पॉलिसीच्या अनुषंगाने बाजारात बँकिंग क्षेत्रातील shares मध्ये मोठी उलाढाल होत असते. त्या दिवशी Intraday trading करणे risky तर असतेच पण नफ्याची उत्तम संधी मानली जाते. देशांतर्गत किंवा अंतरराष्ट्रीय पातळीवर जर काही मोठी राजकीय फेरबदल होत असतील किंवा काही नैसर्गिक आपत्ती असेल तेंव्हा share बाजारात मोठ्या प्रमाणात volatility असते. साधारणतः ख्रिसमस च्या दरम्यान पाश्चिमात्य देशांत सुट्टी असल्याने भारतीय बाजारातील पैशांचा ओघ कमी झालेला असतो जेणेकरून भारतीय बाजार संथगतीने कारभार करत असतो. देशाच्या अर्थसंकल्प वेळेस share बाजारात मोठी उलाढाल होत असते. कोणत्या क्षेत्राला किती निधि मिळतो, काही नवीन सरकारी योजना, देशाच्या अर्थसंकल्पात कोणत्या क्षेत्राला जास्त वाव दिला आहे किंवा तत्सम बाबी लक्षात घेऊन त्या क्षेत्राशी निगडीत कंपन्यांचे shares मध्ये मोठी खरेदी-विक्री होत असते. एक उत्तम उदाहरण द्यायचं झालं तर, दिवाळी व ख्रिसमस काळात भारतात सुट्ट्या असतात व त्या काळात बर्यापच ठिकाणी घराला रंग देण्याचं काम केलं जातं. त्यामुळे Asian Paints, Berger Paints सारख्या रंग विक्रेत्या कंपन्यांचा चांगला नफा होतो. हा नफा मार्च क्वार्टर च्या निकालात (Final) प्रतीत होतो. ही शक्यता ग्राह्य धरून संबंधित कंपन्यांचे shares ह्या काळात वधारतात. गुंतवणूकदार हा काळ आणि नफा लक्षात घेऊन त्यात गुंतवणूक करत असतात. अशीच गोष्ट मान्सून आगमनच्या वेळेस असते. भारतीय अर्थव्यवस्था मान्सून अर्थात पावसावर मोठ्या प्रमाणात अवलंबून असल्याने पाऊस कसा होणार यावरही share बाजारातील पडझड व वाढ अवलंबून असते. पाऊस चांगला झाला तर irrigation, खते व कृषी क्षेत्राशी संबंधित कंपन्यांच्या shares मध्ये चांगली वाढ होते. गुंतवणूकदारास share बाजार अशा अनेक संधी उपलब्ध करून देत असतो. Long Term गुंतवणूकदार असेल किंवा Intraday Trader त्याला ह्या बाबींचा अभ्यास करूनच share बाजारात पैसे लावले पाहिजेत. योग्य Stock ची निवड करणे इथेच अर्ध यश असतं.
WHAT IS RBI POLICY?

बँकाची बँक म्हंटली जाणारी RBI देशाच्या अर्थव्यवस्थेचा धांडोळा घेऊन महागाई, रोजगार आणि अर्थव्यवस्थेशी निगडीत सर्व बाबींचा आढावा घेते अन यावर उपाययोजना किंबहुना नियंत्रण करण्यासाठी तीन महिन्याला आपलं पतधोरण जाहीर करते त्याला RBI Policy म्हणतात. RBI Policy चे उद्दीष्ट हे अर्थव्यवस्थेला रुळावर आणणे आणि गती प्राप्त होईल अशी धोरणे राबवणे यासाठी कार्यरत असते. RBI Policy चा परिणाम थेटपणे सार्वजनिक क्षेत्रातील बँकांवर आणि पर्यायाने अर्थव्यवस्था आणि सामान्य माणसावर होत असतो.
REPO RATE

ज्या Rate ने बँका government securities ला तारण ठेऊन RBI कडून अल्पमुदत कर्ज घेतात, त्या Rate ला Repo Rate म्हणतात. Repo rate is the rate at which the RBI lends short-term money to the banks against the govt approved securities. ज्याप्रकारे सामान्य ग्राहक काहीतरी तारण ठेऊन बँकेकडून कर्ज घेतो अन त्यावर व्याज देतो त्याचप्रमाणे बँका RBI कडून कर्ज घेतात. उदा. बँकेने जर RBI कडून 1000 रुपये कर्ज घेतलं असेल तर सध्याच्या 6.25% या Repo rate नुसार बँकेला RBI ला 1000 + 62.5 = 1062.5 इतके परत करावे लागतील. आता credit policy मध्ये जर Repo rate वाढवला तर बँकेचं आणि पर्यायाने सामान्य ग्राहकाचं कर्ज वाढेल अन बाजारात पैसे कमि होतील. असं केल्यास share बाजारात पडझड संभवते.
REVERSE REPO RATE

जेंव्हा बँका आपल्याकडील अतिरिक्त रक्कम काही काळासाठी RBI कडे ठेवते तेंव्हा RBI त्या रकमेवर ज्या Rate ने परतावा (व्याज) देईल त्याला Reverse Repo Rate म्हणतात. Reverse Repo rate is the rate at which banks deposit’s their short-term excess liquidity with the RBI. सामान्य ग्राहक आपले पैसे बँकेत ठेवतो व त्यावर व्याज मिळवतो तसा हा प्रकार. उदा. जर बँकेने आपली 1000 रुपयांची ठेव RBI कडे ठेवली तर सध्याच्या 5.75 या Reverse Repo Rate नुसार RBI बँकेला 1057.5 रुपये परत करेल. जर बँकेकडे अतिरिक्त असलेला पैसा गुंतवण्यास योग्य मार्ग नसेल किंवा त्यातून assured परतावा नसेल तर बँक आपला अतिरिक्त पैसा RBI कडे ठेवते. Credit Policy मध्ये जर Reverse Repo Rate वाढवला तर अतिरिक्त व्याजच्या आशेने बँका आपला पैसा RBI कडे ठेऊ लागतील जेणेकरून बाजारातील पैसा कमी होईल... यामुळे share बाजारावर नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता असते.
CASH RESERVE RATIO (CRR)

भारतातील बँकेना आपल्याकडे येणार्या0 डिपॉजिट रकमेपैकी काही रक्कम RBI कडे reserve करावी लागते; ती ज्या प्रमाणात ठेवावी लागते त्याला CRR म्हणतात. ही Reserve Amount RBI देशाच्या अर्थव्यवस्थेच्या गरजेनुसार वापरते. CRR चा दर वाढवला म्हणजे ती बँकेकडे कमी पैसा राहतो आणि पर्यायाने अर्थव्यवस्थेत कमी पैसा खेळता राहतो. त्यामुळे CRR वाढवला तरी share बाजारात नकारात्मक प्रतिसाद उमटू शकतात. उदा. जर ग्राहकाचे 1000 रुपये बँकेत जमा असतील तर सध्याच्या 4% या CRR नुसार त्यातील 40 रुपये RBI कडे जमा करावे लागतात.
SLR – STATUTARY LIQUIDITY RATIO

भारतातील बँकेना, कस्टमरला क्रेडिट करण्यापूर्वी आपल्याकडील डिपॉजिट पैकी विशिष्ट प्रमाणातील रक्कम financial security किंवा गोल्ड मध्ये गुंतवावी लागते, maintain करावी लागते. या प्रमाणाला SLR म्हणतात. उदा. बँकेकडील 1000 रुपयांच्या ठेवीकरिता बँकेला सध्याच्या 20% या SLR प्रमाणे 200 रुपयांचे डिपॉजिट financial security or gold मध्ये ठेवावे लागते. अर्थात, याचा interest बँकेला मिळत असतो. SLR चा दर वाढवला तरी तो share बाजारावर नकारात्मक परिणाम करू शकतो. कारण जोपर्यंत बँकेकडे पैसा राहणार नाही तोपर्यंत सामान्य ग्राहकाला त्याचा फायदा मिळणार नाही. आणि पर्यायाने अर्थव्यवस्थेत पैसा खेळता न राहिल्याने महागाई वाढू शकते अन अर्थव्यवस्था मंद होऊ शकते. एकंदरीत, RBI Policy चा share बाजारावर परिणाम होतोच, त्यामुळे volatility ही मिळते पण तो नेमका कोणत्या प्रकारे होईल ते सांगता येत नाही.
BASIS POINT

1% is equivalent to 100 basis point. उदा. Repo Rate 7.75 आहे आणि तो 25 basis point ने वाढवला म्हणजे 25/100 = 0.25 असा होतो... 7.75 + 0.25 = 8 http://www.sai-intradaytips.in/RBI-policy-affects-stock-market.asp

शेयर मार्केट भाग -2

 INDICES & PORTFOLIO
WHAT IS NIFTY AND SENSEX?
NIFTY

NIFTY म्हणजे NSE वर listed असलेल्या टॉप 50 कंपन्यांचा average… NSE [National Stock Of Exchange] वर अनेक कंपन्या list असतात त्यातील market capitalization नुसार ज्या well established कंपन्या असतात त्यांना NIFTY ह्या Index मध्ये स्थान दिलं जातं. त्या 50 कंपन्याच्या वाढण्या आणि कमी होण्यावर NIFTY ची किम्मत अवलंबून असते. एक प्रकारचे average… NIFTYमध्ये विविध क्षेत्रातील (Sector) दिग्गज कंपन्या असतात. ह्या 50 कंपन्याना कायमचे सदस्यत्व नसतं, तर त्या बदलल्या जातात. सामान्यतः विविध क्षेत्रातील कंपण्याचे shares NIFTYत असल्याने हा निर्देशांक कमी किंवा जास्त होणे हे भारतीय अर्थव्यवस्थेशी जोडून पाहिलं जातं. म्हणजे, जर NIFTY वाढत असेल तर विविध sector आणि कंपन्या चांगल्या वाढत आहेत आणि पर्यायाने प्रगती होत आहे असं समजलं जातं. सध्या NIFTY या निर्देशांकाची किम्मत 10000 च्या वर आहे.
SENSEX

SENSEX ज्याप्रकारे NIFTY हा निर्देशांक आहे त्याचप्रकारे SENSEX हासुद्धा एक निर्देशांक आहे. SENSEX अर्थात Sensitive Index वगैरे. याला BSE 30 असेही म्हणतात. BSE [Bombay Stock Of Exchange] मध्ये list असलेल्या अनेक कंपन्यांपैकी financially well established टॉप 30 कंपन्यांचा निर्देशांक म्हणजे SENSEX. या तीस कंपन्यांची निवड त्यांच्या market capitalization, volume वगैरे अशा अनेक parameters वर केली जाते. सध्या SENSEX ची किम्मत 33000 च्या आसपास आहे.
DIFFERENT INDICES
MID CAP

ज्याप्रमाणे NIFTY आणि SENSEX हे index आहेत तसेच विविध क्षेत्राचे काही separate Indices आहेत. NIFTY आणि SENSEX मध्ये सर्वच क्षेत्रातील कंपन्या असतात, पण ज्या Index मध्ये फक्त एका क्षेत्राशी संबंधित stocks असतात त्यांना आपण sectorial indices म्हणतो. यात सर्वाधिक Active Index आहे BankNifty. BankNifty मध्ये टॉपच्या Public Sector Banks आणि Private Banks समाविष्ट केलेल्या असतात. त्यानंतर Nifty PSU Bank या Index मध्ये विविध Public Sector Banks समाविष्ट असतात तर Nifty Private Bank या Index मध्ये Private Banks असतात. Nifty Pharma हा Index विविध pharma shares साठी आहे. उदाहरणार्थ Sunpharma, Ajanta Pharma, Cipla Nifty IT यात टॉपच्या IT कंपन्या असतात. उदाहरणार्थ, Infosys, TCS, KPIT Technology जशी NIFTY आणि SENSEX ची किम्मत ठरली जाते तशीच या Indices ची किम्मत ठरते. पण ह्या Indices मध्ये सरसकट त्या-त्या क्षेत्रातील सर्वच कंपन्या असतात असं नाही. Large Cap, Midcap अशा दर्जेदार कंपन्या त्या Sector Index मध्ये List असतात. कोणत्या कंपन्या INDEX मध्ये INCLUDE करायच्या यासाठी काही निकष असतात. असे विविध Index आहेत.

SMALL CAP, MID CAP & LARGE CAP Market Capitalization
SMALL CAP

कंपनीचे Market Capitalization 1 Billion कोटींपेक्षा कमी असेल तर त्याला Small Cap म्हणतात. ज्या कंपन्या सुरुवातीच्या पायरीवर असतात त्या small cap मध्ये गणल्या जातात. या stocks मध्ये बरीच volatility असते. कमी capital असल्याने यांच्या वाढण्याचा अन घसरण्याचा वेग बराच असतो. उदाहरणार्थ – HDIL, Welspun, Just Dial
MID CAP

कंपनीचे market capitalization जर 2B ते 10B कोटी असेल तर त्याला Mid Cap म्हणतात. या कंपन्यांचं कॅपिटल हे कमीही नसतं आणि Large Cap इतकं जास्तही नसतं, पण त्यांच्यात क्षमता असते Large Cap बनण्याची. उदाहरणार्थ – Ashok Leyland, Bata, CG India, Bank Of India
LARGE CAP

ज्या कंपन्यांचे market cap HUGE असतं त्यांना Large Cap म्हणतात. सर्व Large Cap ह्या सुरुवातीपासून Large Cap नसतात, तर काही Small Cap ते Mid Cap असा प्रवास करून आलेल्या असतात. उदाहरणार्थ, Large Cap – TCS, Maruti Suzuki, ITC
UPPER CIRCUIT & LOWER CIRCUIT

बाजारात एखाद्या वस्तूला खूप मागणी असते याचा अर्थ त्या वस्तुला खरेदी करणारे (Buyers) खूप असतात. Buyers जास्त म्हणजे त्या वस्तूची किम्मत वाढते आणि विक्री करणारा स्वतःला हव्या त्या किमतीला ती वस्तु विकायला उत्सुक असतो. पण बर्यााचदा असं होतं की Demand अर्थात मागणी खूप असली तरी विकायला विक्रेते नसतात; अर्थात Demand (Buyers) आहे पण पुरवठा (Supply) करणारे विक्रेते नाहीत. हा एककल्ली व्यवहार होऊ लागतो. युद्धाच्या किंवा आणीबाणीच्या प्रसंगी अन्नवस्तूंची किम्मत वाढते आणि स्वतःकडे असलेला कोठार कोणीही विकायला तयार नसतो त्याप्रमाणे. Share बाजारातही अशी परिस्थिती निर्माण होत असते. म्हणजे, बाजारासाठी खूप सकारात्मक (आर्थिक पॅकेज, निवडणूक निकाल, स्थिर सरकार इत्यादि) बातमी असेल तर सगळे लोक shares ची खरेदी करत सुटतात अन विकायला कोणी तयार नसतं. अशा One Side Movement मुळे एखादा share किंवा संपूर्ण बाजार अर्थात Nifty, Sensex सारखे Indices सरसकट वाढू लागतात. अशा तीव्र वाढीची परिस्थितीत SEBI ने (ती संस्था जी share बाजारावर देखरेख अन नियंत्रण करते) घालून दिलेल्या नियमांनुसार NSE/BSE सारखे exchanges त्या share किंवा Index ची trading काही काळ थांबवते... म्हणजे, काही काळ trading अर्थात खरेदी-विक्री बंद केली जाते. या अशा परिस्थितीला upper circuit (वरचा अटकाव) म्हणतात. साधारणतः निर्देशांक (Index) किंवा share 10%, 15% , 20% पेक्षा अधिकची वाढ सलग काही trading sessions नोंदवत असेल तर हा Upper Circuit लावला जातो. ही टक्केवारी share आणि Index नुसार बदलू शकते. याचे नियम SEBI ने तयार केलेले असतात अन Exchanges त्याची अमलबजावणी करत असतात. त्यामुळे Upper/lower Circuit लावताना विविध परिमानांचा विचार केला जातो. बाजारात याउलटही स्थिती असू शकते. ती म्हणजे,जर खूप नकारात्मक (भूकंप, राष्ट्रीय आपत्ती, राजकीय घडामोड) घटना घडली तर गुंतवणूकदार आपला पैसा बाहेर काढून घेऊ बघतात, कोणीही shares खरेदी करायला तयार नसतं, सर्वाच्या सर्व विकणारे (Only Sellers) असतात तेंव्हा share किंवा निर्देशांक कोसळू लागतो. अशा परिस्थितीत बाजारावर देखरेख अन नियंत्रण करणार्याक संस्था ट्रेडिंग, अर्थात खरेदी-विक्री प्रक्रिया काही काळ बंद ठेवते.... याला Lower Circuit म्हणतात. Upper Circuit किंवा Lower Circuit वैयक्तिक share ला किंवा Nifty किंवा Sensex सारख्या Index ला लागू असतं. याला circuit filters म्हणतात. अस्थिरतेवर मर्यादा असावी म्हणून SEBI ने हे नियम केलेले असतात. Share किंवा Index दिवसात कमाल व किमान किती वाढू किंवा कोसळू शकतो याला मर्यादा असतात. ही मर्यादा व त्याची टक्केवारी SEBI बदलू शकते. यासाठीही काही गणितं आणि ठोकताळे असतात.
आपल्या Order काय होतात...?

Upper किंवा Lower circuit लागू झाल्याच्या नंतर order टाकता येत नाही. जेंव्हा परत व्यवहार सुरू होतील तेंव्हा orders परत टाकता येतील. पण तुम्ही आधीच टाकून ठेवलेल्या orders pending राहतात. हेतु - असे Circuit लावण्याचा हेतु असा असतो की, खरेदीकर्ते किंवा विक्रीकर्ते कमी होतील. काही सकारात्मक/नकारात्मक न्यूजमुळे गुंतवणूकदार आणि traders सेंटिमेंट ने विचार करून खरेदी-विक्री करत सुटतात. दरम्यानच्या काळात ही मानसिकता कमी होऊन सुरळीत व्यवहार व्हावेत यासाठी circuit लावतात. Upper Circuit लागू होणं एकप्रकारे चांगलं असतं, कारण त्यामुळे बाजारात तेजी अन नवचैतन्य येण्याची चिन्हं असतात. तुम्ही गुंतवणूक केलेल्या share ला जर Upper Circuit लागू झालं असेल तर ती चांगली गोष्ट आहे कारण त्यामुळे त्याची किम्मत वाढती राहून तुम्ही नफ्यात राहता. निर्देशांकना (Nifty &Sensex) Lower Circuit हे अर्थव्यवस्था व गुंतवणुकीसाठी धोक्याची घंटा समजलं जातं. हे बाजारात नकारात्मक बाजूला घेऊन जात असतं. यात अनेक गुंतवणूकदारांना नुकसान सहन करावं लागतं अन पैसे अडकून राहण्याची शक्यता असते. PRICE BAND म्हणजे SEBI ने घालून दिलेली ती Range ज्यामध्ये तो share दिवसभरात कार्यरत राहू शकतो. अर्थात, Upper Circuit आणि Lower Circuit मधील ही range.
WHAT IS A PORTFOLIO?


वर म्हंटल्याप्रमाणे, share बाजारात विविध क्षेत्रातील sector चे shares असतात. दूसरा भाग म्हणजे प्रत्येकाची shares मधील गुंतवणुकीचा हेतु वेगळा असू शकतो. ज्यांना Long Term Investment करायची असते, भविष्यात जेंव्हा गरज आहे तेंव्हा गुंतवलेल्या रकमेचा योग्य परतावा मिळावा अशी अपेक्षा असते ते पैसे गुंतवत असताना योग्य व balanced portfolio तयार करतात. गुंतवणूकदाराने भविष्याची तरतूद करत असताना वेगवेगळ्या sectors मधील योग्य shares खरेदी करून ठेवणे व त्यातून जी long term गुंतवणूक तयार होते त्याला Portfolio म्हणतात. माझ्या Demat वर जे काही shares आहेत तो माझा share portfolio. मी जर आज पाच लाख गुंतवणूक करणार असेन आणि पाच वर्षांच्या नंतर मला त्याचा योग्य परतावा पाहिजे असेल तर मला आज विविध क्षेत्रातील चांगल्या दर्जाचे, वाढ होतील असे shares घ्यावे लागतील. कारण पाच वर्षांच्या नंतर आर्थिक, सामाजिक, राजकीय स्थिती कशी असेल हे आत्ता सांगता येत नाही. उदाहरण द्यायचं झालं तर आज pharma sector विविध अडचणींमुळे योग्य वाढ करत नाहीये, जागतिक कारणांमुळे IT Sector ही मंदीचा सामना करत आहे; पण आज Metal Sector (Tata Steel इत्यादी) किंवा Auto Sector किंवा banking sector चांगल्या स्थितीत आहे. पाच वर्षानी कदाचित यातील काही सेक्टर योग्य स्थितीत असतील तर काही मंदीचा सामना करत असतील. ही सगळी परिस्थिती लक्षात घेऊन आपण आज जी Distributed, Diversified व balanced गुंतवणूक करत आहोत त्याला Portfolio Management म्हणतात. जर सर्वच्या सर्व रकमेची गुंतवणूक एक-दोन कंपन्यांत केली अन काही कारणाने जर आपल्याला हवे असतील तेंव्हा ते shares किंवा sector अडचणीत असेल तर तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीचा योग्य परतावा मिळणार नाही. त्यामुळे गुंतवणूक करताना ती विचारपूर्वक करावी आणि योग्य portfolio तयार करावा. वर दिलेल्या टेबलमध्ये सात वेगवेगळे sectors अन त्या sectors मधील टॉप कंपन्यांची यादी अन वेगवेगळ्या काळातील त्यांची किम्मत किती होती याची माहिती दिली आहे. November 2012 ते January 2017 आणि आज त्या share ची किम्मत कशी कमी जास्त होते ते दर्शवले आहे. यात एक बाब लक्षात ठेवली पाहिजे की दरम्यानच्या काळात त्या कंपनीने Dividend, Bonus, Split यासारख्या Corporate Actions ही घडल्या असू शकतात. याची माहिती पुढे घेऊ. पण ढोबळमानाने या किमती आपण ग्राह्य धरू शकतो. नोवेंबर 2012 मध्ये जर मी सातही कंपन्यांचे प्रत्येकी 1 असे shares खरेदी केले असते तर त्यांची वेगवेगळ्या कालावधीत किम्मत किती असू शकते हे त्या टेबलमध्ये कळेल. म्हणजे मी जर माझी एकत्रित गुंतवणूक कधीही काढू इच्छित असतो तरी मला नफाच मिळाला असता. मूळ गुंतवणुकीच्या चांगला परतावा. याउलट, जर मी फक्त SBIमध्ये 220 या रेटने सर्वच पैसे गुंतवले असते आणि जानेवरी 2017 ला ती गुंतवणूक संपवली असती तर मला खूप कमी परतावा मिळाला असता. कारण जानेवरी 17 मध्ये बँकिंग सेक्टर किंवा SBI चा share काही कारणास्तव वाढ करू शकत नव्हता. किंवा Sunpharmaमध्ये जर मी एप्रिल 2015 ला गुंतवणूक केली असती तर आजच्या रेटनुसार मी नुकसानीत असतो. यावरून एक गोष्ट सिद्ध होते की गुंतवणूक करताना विशिष्ट नियोजन आणि त्यातील माहिती असायला हवी. सरळसोट कुठलेही shares घेऊन ठेवणे हे योग्य गुंतवणुकीचे लक्षण नाही. कंपनीचा Share जरी चांगला असला तरी तो सदासर्वकाळ वाढतच राहील असं नसतं. विविध कारणास्तव त्या सेक्टर किंवा त्या share मध्ये पडझड होत असते. गुंतवणुकीचा काळ, गुंतवणुकीची अमाऊंट, चालू आर्थिक परिस्थिती अन भविष्यातील बाबींचा विचार करून shares निवडणे, त्यात परिस्थितीनुसार बदल करणे, एकंदर रणनीती ठरवणे याला Portfolio Management म्हणतात, आणि त्या shares ची गोळाबेरीज म्हणजे योग्य portfolio. साधं उदाहरण द्यायचं झालं तर, गावाला जाताना आपण सर्वच्या सर्व रक्कम एकाच ठिकाणी ठेवत नाहीत. कारण ती चोरीला गेली किंवा काही गफलत झाली तर आपण अडचणीत येऊ शकतो. त्यासाठी आपण आपले पैसे पाकिटात, बॅगेत असं विविध ठिकाणी ठेवतो जेणेकरून एका ठिकाणची रक्कम जरी चोरीला गेली तरी दुसर्याि ठिकाणची रक्कम आपल्याला उपयोगी पडते. ठळकपणे वर दिलेल्या टेबलमध्ये वेगवेगळ्या सेक्टरमधील फक्त टॉप कंपन्या घेतल्या आहेत. त्या सेक्टरमध्ये अजूनही उत्तमोत्तम कंपन्या असू शकतात. यात तुम्ही एखादी छोटी पण भविष्यात चांगला परतावा देऊ शकण्याची अपेक्षा असणारी कंपनीही जोडू शकता. उदाहरण द्यायचं झालं तर Auto Sector मधील Ashok Leyland हा share July 2014 ला 30 रुपये होता ज्याची October 2017 मध्ये किम्मत 120 रुपये आहे. अशा अनेक कंपन्या आहेत ज्यांच्यात चांगला परतावा देण्याची क्षमता असते. ते shares आपण आपल्या portfolio मध्ये अॅड करू शकतो.
A MIDCAP & SMALLCAP PORTFOLIO


GLOBAL INDICES
html image examplehtml image example
भारतीय share market सकाळी 9.15 मिनिटांनी सुरू होतो आणि दुपारी 3.30 वाजता बंद होतो. पण यामध्ये PRE-OPEN आणि POST CLOSE असा काही मिनिटांचा कालावधी असतो. PRE-OPEN हा सकाळी 9 वाजता सुरू होतो. सकाळी 9 ते 9.15 या 15 मिनिटांचे तीन भाग केलेले आहेत. या PRE OPEN मध्ये आपल्याला ORDERS टाकून ठेवता येतात. पण त्या market सुरू झाल्याच्या नंतर अर्थात 9.15 मिनिटांनाच Execute होतात, तेही तुम्ही टाकलेला rate match झाला तर. म्हणजे मला Reliance खरेदी करायचा असेल आणि काल तो 910 ला बंद झाला असेल तर मी PRE-OPEN SESSION मध्ये ते 905 ला BUY करायला ठेवेन. 9.15 वाजता Reliance 904 ला OPEN झाला तर तो मला मिळेल आणि 911 किंवा 905 च्या वर OPEN झाला तर मला तो मिळणार नाही. पण ती ORDER तशीच राहील, CANCEL होणार नाही. त्या rate ला share price आल्याच्या नंतर तो BUY होईल. PRE OPEN SESSION मध्ये 9 ते 9.08 मिनिटांपर्यन्त Orders Collect केल्या जातात. म्हणजे सर्व Orders Exchange कडे सबमिट होतात. या वेळेत तुम्ही Order CANCEL किंवा MODIFY करू शकता. 9.08 ते 9.15 या काळात सर्व ORDERS तपासून BUYERS & SELLERS आणि त्यांचे Rates बघून त्या share चा Rate Decide होतो. यालाच PRICE DISCOVERY म्हणतात. PRE-OPEN SESSION हे PRICE DISCOVERY साठी असतं. म्हणजे एकंदरीत MARKET/SHARE चा कल काय आहे हेही समजतं आणि त्यामध्ये गुंतवणूकदाराला भाग घेता येतो. BUYERS आणि SELLERS यानुसार TREND कळतो. बर्या चदा market 9.15 वाजता सुरू होताच अचानक MOVEMENT येते, त्यात आपल्याला योग्य दरात share मिळून नफा कमावता यावा यासाठी PRE-OPEN मध्ये order टाकल्या जातात. POST CLOSE मध्ये मार्केट बंद झाल्याच्या नंतरही तुम्हाला ORDER टाकता येते, पण त्याला काही criteria आहे. याची वेळ असते 3.40 ते 4 वाजेपर्यंत. या काळात BUY किंवा SELL order market rate ने टाकावी लागते. ती order market rate ने टाकली तरी Exchange कडे ती CLOSE RATE ने submit केली जाते. समजा, Reliance ची 3.30 वाजता close price आहे 800. आता 3.40 ते 4 वाजेपर्यंत Market Rate ने Buy/Sell अशी order टाकता येते. कोणत्याही Rate ने order टाकली तरी Exchange कडे ती Close Rate (800) नेच submit केली जाते. POST MARKET मध्ये जास्त Volume नसते. जर Buyers असतील तरच तुमची Sell order execute होण्याची शक्यता असते आणि Sellers असतील तरच तुमची Buy Order Execute होण्याची शक्यता असते. 4 वाजेपर्यंत जर ती Order Execute झाली नाही तर ती CANCEL होते. उद्यासाठी लागू होत नाही. यात अजून एक प्रकार आहे, तो म्हणजे AFTER CLOSE SESSION. ही POST MARKET नंतर म्हणजे 4 वाजता नंतर टाकावी लागते. ज्यांना 9.15 ते 3.30 या वेळेत सहभागी होता येत नाही पण shares खरेदी करायचे असतात ते market बंद झाल्याच्या नंतर Orders टाकू शकतात. ही Order तुम्हाला हव्या असलेल्या Rate ने टाकता येते. दुसर्या दिवशी सकाळी Open Price नुसार share मिळणार की नाही हे निश्चित होतं.
GLOBAL INDICES

ज्याप्रमाणे आपल्याकडे NIFTY, SENSEX हे Market Indicaters आहेत तसेच प्रत्येक देशाचे असतात. भारतीय बाजारात परदेशी खरेदी-विक्री करू शकतात आणि भारतीय सुद्धा परदेशी बाजारात खरेदी-विक्री करू शकतात. अर्थात यासाठी नियम-अटी असतात. सामान्यपणे जगभरातील घडामोडींचा भारतीय share बाजारावर परिणाम होत असतो. जागतिकीकरण व परराष्ट्रव्यवहार यामुळे जगातील सर्व अर्थव्यवस्था आणि पर्यायाने share बाजार एकमेकांवर अवलंबून असतात.
Asian Markets

Nikkei – हा जपानचा Index आहे. Hang Seng – हा चीनचा Index आहे. KOSPI – हा कोरिया चा Index आहे. Straits Times - the benchmark index for the Singapore stock market. तेथील Top 30 कंपन्यांचा हा Index आहे.
European Markets

FTSE100 - Financial Times Stock Exchange. हा London Stock Exchange वर लिस्ट झालेला Index आहे. यात Top 100 कंपन्या असतात. CAC40 – हा French Stock Market चा Index आहे. DAX – Germen मधील Top 30 कंपन्यांचा Index आहे. Nasdaq – हा US Market चा Index आहे. SGXNIFTY – भारताचा NIFTY जो Singapore मध्ये Trade केला जातो. DOW FUTURES - NEW YORK STOCK EXCHANGE (NYSE) & Nasdaq वरील महत्वाच्या कंपन्या यात असतात. ज्याप्रमाणे भारतात SENSEX, NIFTY आणि मग इतर Index असतात तसे विविध देशात विविध Index असतात. याबद्धल माहिती नसली तरी चालेल. पण आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि बाजार यांचा भारतीय share बाजारावर परिणाम होत असतो, त्यामुळे यांच्यातील उतार-चढाव बघितले पाहिजेत.

शेयर मार्केट ओळख भाग -1

          शेअर कसे खरेदी करावे?
ज्या DP मध्ये // Brokerage कंपनीत (Motilal Oswal वगैरे) तुम्ही डिमॅट खातं उघडलं आहे त्या कंपनीचे विविध Application Software मोबाइलवर, कम्प्युटरवर घेऊन तुम्ही शेअर खरेदी विक्री करू शकता किंवा तुम्ही जर ब्रोकरकडे जाऊन खातं उघडलं असेल तर त्यांना फोन करून शेअर खरेदी-विक्री करायला सांगू शकता. हे दोन्ही पर्याय शेअर खरेदी-विक्री करताना उपलब्ध आहेत.
खरेदी – विक्री प्रक्रिया
Share बाजारात नव्याने येणार्याच व्यक्तिला मूलभूत प्रश्न असा असतो की मी जर कुठला share खरेदी करत असेन तर विकणारा कोण असतो अन मी विकत असेन तर खरेदी कोण करतो?? तसं पाहता ह्या तांत्रिक प्रक्रियेशी आपल्याला तसं फार देणं घेणं नसतं. आपल्याला हव्या असलेल्या rate ला तो share आल्यावर खरेदी किंवा विक्री करणे हा महत्वाचा मुद्दा. पण उदाहरण द्यायचं झालं तर... आपण एखादी वस्तु खरेदी करण्यासाठी मॉलमध्ये जातो. हवी असलेली वस्तु योग्य दरात मिळत असेल तरच आपण ती विकत घेतो. ती वस्तु मॉलमध्ये त्या कंपनीने त्यांना परवडणार्याप किमतीत विक्रीला ठेवलेली असते. मॉल ही जशी खरेदी विक्रीची जागा झाली, देवाणघेवाण करण्याची जागा झाली तसेच shares ची खरेदी-विक्री करण्यासाठी एक जागा असते; आपण त्याला EXCHANGE BOARD म्हणतो. उदाहरण, NSE - NATIONAL STOCK OF EXCHANGE किंवा BSE – BOMBAY STOCK OF EXCHANGE. यांच्यामार्फत shares ची देवाण-घेवाण होते. असे विविध exchange आहेत. तुम्हाला PQR हा share हवा असेल तर तुम्ही ब्रोकरच्या मार्फत exchange वर तुम्हाला हव्या असलेल्या किमतीला तो demand करता. आणि पलीकडे तुमच्यासारखाच एक गुंतवणूकदार जर PQR share विकू इच्छित असेल तर तोही exchange कडे त्याला विक्रीस ठेवतो. असे अनेक खरेदी-विक्री करणारे exchange कडे आपआपल्या रेट ला तो खरेदी-विक्रीला ठेवतात. आता जर PQR चा बाजारातील रेट 250 असेल तर खरेदी-विक्री करणार्यांेना त्याच किमतीच्या आसपासचा रेट द्यावा लागतो. कारण तुम्ही जर 200 रूपयांचा खरेदी रेट टाकला तर विक्री करणारा इतक्या कमी रेट ला तो विकणार नाही कारण त्या share ची बाजार value 250 आहे. याहून सोप्पं उदाहरण असेल ते निलामीचं! शेतकरी जेंव्हा त्याचा माल कृषि उत्पन्न बाजार समितीत विक्रीसाठी आणतो तेंव्हा त्या मालाची बोली लावली जाते. बोली लावणारे त्यांना परवडणारी/पटणारी किम्मत देऊन बोली लावतात. जो सर्वात जास्त किम्मत करेल अन बोली लावेल आणि जर त्या शेतकर्या्ला तो मान्य असेल तर त्या उत्पादनाची देवाण-घेवाण होते. तो माल किंवा उत्पादन बाजारात विक्री करण्यासाठी जसे दलाल आणि बाजार समिती पैसे घेते तसेच shares खरेदी-विक्री प्रक्रियेवर brokerage houses (Angel Broking, Motilal Oswal इत्यादी) आणि exchanges (NSE, BSE) त्यावर पैसे आकारतात. बाजारात विक्रीस आलेला उत्पादन जर दर्जेदार असेल, त्या उत्पादनाला मागणी जास्त असेल व त्याचे विक्रेते कमी असतील तर त्याची किम्मत वाढते. म्हणजे, ते उत्पादन खरेदी करण्यासाठी शंभर खरेदीकर्ते तयार असतील, विक्रेते सात-आठच असतील तर त्यांच्यात चढाओढ लागून सर्वाधिक किम्मत करणार्यालला ते उत्पादन मिळतं. यानुसारच त्या उत्पादनाची किम्मत ठरते... हेच तंत्र share च्या बाबतीत लागू होतं. अलीकडील उदाहरण द्यायचं म्हंटलं तर, अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सरकारी बँकांना दोन लाख कोटींची मदत जाहिर केली. त्यामुळे त्या बंकांची पत सुधारण्यात मदत होणार होती. यामुळे त्या बँकाच नफा व परिस्थिती वाढेल आणि चांगला परतावा मिळण्याची अपेक्षा वाढली. या कारणास्तव दुसर्याण दिवशी अचानक त्या बँकेच्या shares मध्ये खरेदी वाढली, आणि ते त्या shares ची किम्मत वाढली. ही झाली shares आणि त्याच्या खरेदी-विक्रीची संपूर्ण प्रक्रिय
TYPES OF MARKET = > PRIMARY MARKET

जेंव्हा एखादी अस्तीत्वात असलेली कंपनी share बाजारात नव्याने उतरत असते, ज्या प्रक्रियेतून त्या कंपनीला भांडवल निर्मिती करता येते, तेंव्हा SEBI च्या परवानगीने ती Stock Exchange मध्ये list होत असते. सामान्य गुंतवणूकदारांना त्यात सहभाग घेता यावा अन त्या कंपनीचे shares घेऊन कंपनीत भागधारक होता यावे यासाठी ती प्रक्रिया असते. या प्रक्रियेला IPO - Initial Public Offering प्रक्रिया म्हणतात. या प्रक्रियेतून कंपनीलाही भांडवल उभं करता येतं. यात कंपनीला स्वतःची सर्व माहिती जाहीर करावी लागते. Share चा दर ठरवलेला असतो. सामान्य गुंतवणूकदार या प्रक्रियेत सहभागी होऊ शकतात. याला primary market म्हणतात. जेथे सामान्य गुंतवणूकदार थेट कंपनीकडून shares खरेदी करून भागधारक होतो. उदाहरणार्थ, Avenue Supermart कंपनीचा share हा बाजारात नव्याने आणला जात होता. तो share खरेदी करता यावा म्हणून IPO चा form भरून तो खरेदी करणे ही Primary market प्रक्रिया.
SECONDARY MARKET

ज्या मार्केटमधून गुंतवणूकदार थेट बाजारातून shares खरेदी किंवा विक्री करतो त्याला Secondary Market म्हणतात. म्हणजे, ज्या कंपनीचा share बाजारात आधीपासूनच उपलब्ध आहे, त्याचे rates रोज कमी-जास्त होत असतात, जिथे रोज वेगवेगळे खरेदी-विक्री करणारे असतात ते मार्केट म्हणजे Secondary Market. उदाहरणार्थ, Infosys कंपनीचा share बाजारात आधीपासूनच उपलब्ध आहे. त्याची खरेदी विक्री म्हणजे secondary market. साधारणपणे, थेट कंपांनीकडून shares खरेदी केले जात असतील तर त्याला primary market आणि बाजारातून exchange मार्फत जर shares ची खरेदी-विक्री होत असेल तर त्याला secondary market trading म्हणतात. याशिवाय मार्केटमध्ये derivatives, currency, debentures, bonds हेसुद्धा प्रकार असतात.
TYPES OF INVESTMENT IN SHARE MARKET

तसं पाहायला गेलं तर प्रत्येक investor वेगळा investor असतो. प्रत्येकाच्या गुंतवणुकीच्या गरजा, हेतु, कारणे वेगवेगळी असू शकतात. प्रत्येकजण स्वतःच्या personality आणि rquirement नुसार invest आणि trade करत असतो.
INTRADAY TRADING

या प्रकारात तुम्ही एखाद्या कंपनीचा share आजच खरेदी करता अन आजच विकता. भारतीय Share बाजार सकाळी 9.15 ला सुरू होतो अन दुपारी 3.30 ला बंद होतो. ह्या एकदिवसीय कालावधीत जर share खरेदी केला अन विकूनही टाकला तर त्याला Intraday Trading म्हणतात. असं करण्याचे काही फायदेही आहेत अन तोटेही. पण Intraday Trading करण्यामागे कमी कालावधीत जास्त पैसे मिळवणे हा हेतु असतो. उदाहरणार्थ, एखाद्या कंपनीबद्दल काही सकारात्मक बातमी असेल किंवा त्या कंपनीचे आज चांगले त्रैमासिक निकाल (Quarterly Results) अपेक्षित असतील तर सकाळी तो share जास्त quantity ने खरेदी करायचा अन चांगला परतावा मिळताच त्याच दिवसात विकून टाकायचा. फायदे- कमी कालावधीतं चांगल्या परतव्याची शक्यता असते. Intraday trading करण्यासाठी ब्रोकर किंवा कंपनी तुम्हाला margin (साध्या भाषेत उधारी) देते ज्यात तुम्ही 100 रुपये असतांनाही 1000 रुपयांपर्यंत खरेदी-विक्री करू शकता. पण अट अशी असते की तो trade तुम्हाला त्याच दिवशी संपवावा लागतो. Intraday Trading साठी brokerage कमी आकारलं जातं. साधारणपणे traded value 0.1% असतं जे खरेदी अन विक्री करताना द्यावं लागतं. तोटे- यामध्ये रिस्क अधिक आहे. दिवसातला पूर्णवेळ (trade पूर्ण होईपर्यंत) तुम्हाला यावर खर्च करावा लागेल. कारण त्या share ची किम्मत कमी-जास्त होत असते अन योग्य दर येताच तुम्हाला तो विकावा लागतो.
DELIVERY OR POSITIONAL INVESTMENT

सामान्यपणे, एखादा share आज खरेदी करून नंतर विकणे म्हणजे delivery or long term investment. जर भविष्यासाठी गुंतवणूक करायची असेल किंवा काही कालावधीनंतर चांगला परतावा हवा असेल तर delivery investment केली जाते. उदाहरणार्थ, नोकरी करणारी व्यक्ति रिटायरमेंट किंवा त्याच्या मुलांच्या भविष्यासाठी दहा-बारा वर्षांकरिता गुंतवणूक करत असेल तर ती long term investment असते. किंवा आज एखाद्या share मध्ये गुंतवणूक केली अन दहा दिवसांत किंवा दोन महिन्यांत जर चांगला परतावा मिळणे अपेक्षित असेल तर त्याला positional investment/Short term म्हणतात. उदाहरणार्थ, जर पुढील आठवड्यात देशाच्या economy बाबतीत काही महत्वाची घोषणा होणे अपेक्षित असेल तर आपण त्याच्याशी संबंधित shares घेऊन ठेऊ शकतो जे आपल्याला चांगला परतावा देऊ शकतात. अशा छोट्या कालावधीच्या गुंतवणुकीला Positional Investment म्हणतात. फायदे – या प्रकारच्या गुंतवणुकीत रिस्क कमी असते. वेळेचा अपव्यय टळतो. दरम्यानच्या काळात dividend सारखे छोटे फायदे मिळतात. कंपनी चांगली असेल तर तो share तुम्ही hold करू शकता. तोटे – कालावधी जास्त असेल आणि चुकीच्या share मध्ये जर पैसा गुंतवला असेल तर चांगला परतावा मिळत नाही. शिवाय अडचणीच्या काळी जर पैसा हवा असेल आणि काही कारणास्तव त्या कंपनीचा share तोट्यात असेल तर तुमची गुंतवणूक निष्फळ ठरते. पैसे अडकून राहण्याची शक्यता असते. Delivery Investment मध्ये brokerage Intraday Trading पेक्षा जास्त असतं. साधारणपणे, ते total traded value च्या 0.3 तो 0.5% असतं जे खरेदी आणि विक्री करताना द्यावं लागतं.
Legal Or Illegal?

ज्याप्रकारे वर्गाला मॉनिटर असतो, महापालिकेला आयुक्त त्याप्रकारे share market अन संबंधित गोष्टींवर लक्ष ठेवण्यासाठी अन नियंत्रित करण्यासाठी एक स्वतंत्र सरकारी संस्था आहे. त्याचं नाव आहे SEBI (Securities & Exchange Board Of India) SEBI "protect the interests of investors in securities and to promote the development of, and to regulate the securities market and for matters connected there with or incidental there to." एकंदरीत, ह्या क्षेत्रात होणार्या वाईट गोष्टींना प्रतिबंध लावणे, नियमन करणे, त्यावर देखरेख ठेवणे अन सामान्य गुंतवणूकदारांच्या हक्काचं संरक्षण करणे हे या संस्थेचं काम आहे. SEBI ही संस्था share बाजारात होणार्याे अनियमित व चुकीच्या गोष्टींवर प्रतिबंध आणतात. बर्या चदा बनावट कंपनी किंवा अन्य मार्गाने या प्रवृत्ती गैरव्यवहार करण्याचा प्रयत्न करत असतात ज्यावर SEBI देखरेख ठेवत असते. सामान्य गुंतवणूकदारची फसवणूक होऊ नये ही जबाबदारीही SEBI ची असते. त्यामुळे, सर्वात महत्वाची आणि लक्षात ठेवायची बाब म्हणजे, येथे आपल्या पैसे सुरक्षित असतात. Share बाजारातील गुंतवणूक ही पैसा बुडवते ही संकल्पना चुकीची आहे. जोपर्यंत गुंतवणूकदार चुकीचे निर्णय घेत नाही तोपर्यंत share बाजारातील पैसा बुडत नाही; फार तर गुंतवलेला पैसा कमी परतावा देईल, उशिरा परतावा देईल पण तो कायमचा बुडेल हे चूक आहे. योग्य गुंतवणूक करणे, दर्जेदार कंपन्यांचे shares घेणे आणि, चौकशी करून निर्णय घेणे आणि योग्य सल्लागार नेमणे हे आपलं मुख्य काम आहे. न करायच्या गोष्टी – Demat account काढताना ब्रोकरची पूर्ण माहिती मिळवणे. शक्यतो ओळखीच्या अन विश्वासू ब्रोकरकडे खातं उघडणे. जर Demat account online प्रक्रिया करून सुरू करत असाल तर विशेष काळजी घ्यावी. या क्षेत्रात कोणाच्याही हातात कॅश पैसे देण्याची आवश्यकता नसते. जे व्यवहार होतात ते चेक किंवा ऑनलाइन ट्रान्सफरद्वारे होतात. चेक कधीच individual नावाने नसतो. चेक नेहमी brokerage company // DP च्या नावाने असतो. तुम्ही ब्रोकरला किंवा agent ला कसलेही पैसे देणे लागत नाहीत. कोणाच्याही सांगण्यावरून shares खरेदी-विक्री करणे चुकीचं आहे. जोपर्यंत तुम्ही चूक करत नाहीत तोपर्यंत तुमचे पैसे कुठेच जात नाहीत. सुरूवातीला शक्यतो चांगल्या, दर्जेदार, ब्ल्यु चीप कंपन्यांत गुंतवणूक करावी. जर share market चं trading software (ज्याद्वारे तुम्ही actual खरेदी-विक्री करू शकता) वापण्यात अडचण येत असेल तर त्याद्वारे खरेदी विक्री न करता ब्रोकरमार्फत खरेदी-विक्री करावी. त्यासाठी वेगळे पैसे लागत नसतात. इंटरनेटच्या एका क्लिक वर तुम्हाला याबद्दल सर्व माहिती मिळू शकते. किंवा काही शंका असल्यास तुम्ही माहितीगार व्यक्तिला विचारू शकता किंवा SEBI, Brokerage Firm इत्यादी संस्थांचे कॉल सेंटर/ईमेल असतात जेथे तुम्ही चौकशी करू शकता.
TRADING & SETTLEMENT // SHARE खरेदी करताना अन विक्री झाल्यावर...

Shares खरेदी करण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला demat खात्यात पैसे टाकावे लागतात. Demat मध्ये पैसे टाकण्याचे दोन मार्ग आहेत. 1. एक म्हणजे Online Transfer ह्या प्रक्रियेद्वारे... Digital Way Of Payment यासाठी आधी तुमचं Demat खातं तुमच्या बँकेच्या savings खात्याशी लिंक केलं पाहिजे. शिवाय तुमच्या savings account ला Internet Banking ही सुविधाही उपलब्ध पाहिजे. 2. Demat खात्यात पैसे जमा करण्याचा दूसरा पर्याय आहे Cheque payment अर्थात Physical Way Of Payment यामध्ये, तुम्हाला brokerage कंपनीच्या नावाने cheque द्यावा लागतो. अर्थात, जर तुमचे Demat Angel Broking कडे maintain असेल तर “angel broking pvt ltd” या नावाने cheque द्यावा लागतो. उदाहरणार्थ, तुमच्या Demat खात्यात जर दहा हजार रुपये असतील तर तुम्ही तेवढ्या किमतीचे कोणतेही shares खरेदी करू शकतात. मागे सांगितल्याप्रमाणे त्या खरेदी किमतीवर brokerage company brokerage आणि सरकार टॅक्स आकारते. Demat खात्यावर पैसे असतील तरच तुम्ही shares खरेदी करू शकतात. जर तुम्ही आज shares विकले तर विकलेल्या shares ची amount Demat खात्यावर संध्याकाळपर्यन्त दिसेल, पण ते पैसे तुम्हाला दोन दिवसांच्या अवधिनंतर आपल्या savings खात्यात मिळू शकतात. विकलेल्या दिवशी लागलीच पैसे मिळत नसतात. त्याला T + 2 settlement असं म्हणतात. त्यामुळे argent गरज असेल तर share बाजार गुंतवणुकीतील पैसे तातडीने मिळतील याची खात्री नसते. पण दोन दिवसांनी संपूर्ण रक्कम तुमच्या savings खात्यावर ट्रान्सफर करता येते. Shares खरेदीमध्ये दूसरा भाग आहे मार्जिन ट्रेडिंगचा. समजा, तुमच्याकडे जर आधीचेच खरेदी केलेले चाळीस हजारांचे shares (portfolio) आहेत अन दहा हजार कॅश Demat ला जमा आहे. तुम्हाला आता पंधरा-वीस हजारांचे shares खरेदी करायचे आहेत. तर brokerage company तुम्हाला तुमच्या आधीचे shares वर उधारी (margin) देते अन तुम्ही पंधरा हजारपर्यन्त (तुमच्या खात्यावर किती किमतीचे shares आहेत यावर ही उधार अर्थात margin amount ठरत असते) खरेदी करू शकता. म्हणजे, फक्त दहा हजार असतांनाही तुम्ही पंधरा हजारांचे shares खरेदी केलेले आहेत. पण दोन दिवसांत राहिलेली रक्कम (ह्या उदाहरणात पाच हजार) तुम्हाला demat खात्यात जमा करावी लागते. जर तुम्ही उर्वरित रक्कम Dematला जमा केली नाही तर उधार (margin) रकमेवर (म्हणजे पाच हजारची) brokerage company व्याज लावते. एका विशिष्ट कालावधीनंतरही जर तुम्ही पैसे जमा नाही केले तर तुमचे आधीचे shares (Portfolioतिल Your Security Holding) परस्पर विकून आपले पैसे वसूल करते. ही सर्व प्रक्रिया आपला Demat खात्यावर होते अन आपल्याला त्या संबंधित सूचना मोबाइल अन ईमेल वर येत असतात. त्यामुळे, आपल्या holding वर जरी नवीन shares उधारीत खरेदी करण्याची सुविधा असली तरी पैसे जमा करता येणार असतील तरच Margin Trading चा लाभ घ्यावा, अन्यथा आहे ती गुंतवणूकही धोक्यात येऊ शकते. हा सर्व प्रकार बँकेच्या Credit Card सारखा आहे जेथे आपल्या saving खात्यावरील रक्कम, व्यवहार किंवा FD वर ती बँक उधार पैसे देते अन नंतर तुम्हाला ते bill भरावं लागतं. उदाहरण समजा, सोमवारी मला एका मित्राची गाडी आवडली. मी त्याला 50000 रुपये दिले आणि गाडी विकत घेतली. आता तांत्रिकदृष्ट्या ती गाडी माझी आहे, त्याने ती गाडी मला दिली पाहिजे. पण मंगळवारी RTO वगैरे कामे केल्याशिवाय ती गाडी माझ्या नावावर होणार नाही. त्यामुळे सोमवारी जारी मी ती गाडी घेतली तरी मंगळवारी त्याचं माझ्यानावाने register होईल अन मला बुधवारी ती मला मिळेल. याला T+2 days settlement म्हणतात. Today + 2 days. यामध्ये समजा, मंगळवारी मला कोणीतरी तीच गाडी 55000 हजारांना मागितली तर ??? तरीही मी ती गाडी त्यांना विकू शकतो. ह्या केसमध्ये, मंगळवारी मी त्यांच्याकडून पैसे घेईन, बुधवारी माझ्याकडे गाडी आल्यावर ती त्याच दिवशी तिसर्याय व्यक्तीच्या नावाने रजिस्टर करेन आणि गुरुवारी त्या गाडीची Delivery त्यांना देईन.
TYPES OF STOCKS // विविध प्रकारचे shares
Share काय असतो हे आपण बघितलं पण ते shares कोणकोणत्या प्रकारचे असतात ते बघूयात. Share बाजारात आठ हजारांपेक्षा जास्त कंपनीचे shares आहेत. त्यात रोजच्या व्यवहारात असलेली State Bank Of India पासून ते IT company Infosys, दुचाकी गाड्यांची कंपनी Bajaj, चहाची Tata Coffee अशा विविध प्रकारच्या कंपन्यांचे shares असतात. ह्या वेगवेगळ्या क्षेत्रातील कंपन्या बाजारात असतात अन त्या क्षेत्रांना आपण Sector म्हणतो... Banking Sector मध्ये SBI, AXIS Bank, ICICI Bank, Bank Of Maharashtra अशा विविध बँका येतात. दुचाकी गाडी निर्मिती क्षेत्रात (sector) Bajaj, Hero Motocomp, TVS अशा कंपन्या येतात. औषधनिर्मिती क्षेत्रात Sunpharma, Cipla, Lupin अशा कंपन्यांचा समावेश होतो. FMCG (Fastly Moving Consumer Goods) अंतर्गत Asian Paints, Hindustan Unilever, ITC अशा रोजच्या वापरत लागणार्या वस्तूंची निर्मिती करणार्याr कंपन्या असतात. असे विविध सेक्टर असतात.
सर्व माहिती संग्रहीत 

Start-up Street: Social justice and the start-up ecosystem

Disparities in start-ups are a global phenomenon and affirmative action is needed to ensure an equal opportunities environment for aspiring...